शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

साखर कामगारांच्या पगारवाढीचा २६ रोजी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST

यड्राव : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीतील चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला ...

यड्राव : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या मुंबई येथे आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीतील चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय? होण्याची शक्यता आहे. ही बैठक समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

साखर कामगार वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली आहे. पगारवाढीसाठी विलंब होत असल्याने व मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने राज्यव्यापी साखर कारखाने बेमुदत संप जाहीर केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शासनाने जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन केली.

समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत साखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये साखर कामगार कामगारांना ४० टक्के पगारवाढीची मागणी तसेच अंतरिम पगारवाढीऐवजी अंतिम पगारवाढ द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २६ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीत पगारवाढीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बैठकीत साखर कामगार आयुक्त शेखर गायकवाड, कामगार उपायुक्त रवीराज इळवे, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, रावसाहेब पाटील, अविनाश आपटे, रावसाहेब भोसले, सुरेश मोहिते, अशोक बिराजदार, योगेश हंबीर व प्रदीप बनगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.