शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीबाबत १५ दिवसांत निर्णय

By admin | Updated: August 2, 2016 01:19 IST

देवेंद्र फडणवीस : गुणवत्तेच्या निकषावर निर्णय घेण्याचे मुंबईतील बैठकीत आश्वासन

भारत चव्हाण/सतीश पाटील --मुंबई---कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत विरोधक आणि हद्दवाढ समर्थक यांनी ठामपणे आपापल्या बाजू मांडल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्याही बाजू रास्त वाटत असल्याने अधिवेशन संपल्यानंतर चार पाच प्रमुख तज्ज्ञ मंडळींशी प्रत्यक्ष बोलून यासंदर्भात गुणवत्तेच्या निकषावर येत्या पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. सोमवारी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, करवीर पंचायत समितीच्या सभापती स्मिता गवळी यांच्यासह हद्दवाढ विरोधी तसेच समर्थक सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सुमारे ४० मिनिटे जोरदार युक्तिवाद करीत आपली बाजू ठामपणे मांडली. त्यामध्ये हस्तक्षेप करीत वरील आश्वासन दिले. शाब्दिक वादाची झालरहद्दवाढीस विरोध करणारे चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर हे दोन्ही आमदार शहरात राहतात. शहरातील सुविधा वापरतात आणि त्यांचा हद्दवाढीला का विरोध आहे समजत नाही, असे आर. के. पोवार म्हणताच बैठकीत वादाची ठिणगी पडली. नरके यांनी त्याला हरकत घेताना ज्या सुविधा मी घेतो त्याचा कर भरतो, अशा शब्दात सुनावले. त्यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दोघांनाही रोखत वैयक्तिक पातळीवर चर्चा नेऊन वाद वाढवू नये, तुम्ही तुमच्या बाजू मांडा, असे दोघांनाही बजावले. हद्दवाढ रेंगाळणार? : राज्य निवडणूक आयोगाने शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो १ सप्टेंबरपूर्वी घ्यावा, अशी सूचना सरकारला केली आहे; परंतु सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर तज्ज्ञ लोकांशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केल्यामुळे आता हद्दवाढीचा प्रस्ताव रेंगाळण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. कारण हद्दवाढ करायची झाल्यास तसा अध्यादेश काढून एक महिन्याची मुदत सूचना व हरकतींसाठी द्यावी लागणार आहे; परंतु हे सगळे वेळेत घडणे अशक्य झाल्यामुळे किमान वर्षभर तरी यावर निर्णय होईल, असे दिसत नाही. माझी अवस्था जजसारखी : दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतर बैठकीची सांगता करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली द्विधा मनस्थिती झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले. एखाद्या जजसमोर दोन निष्णांत वकिलांनी आपली बाजू ठामपणे मांडावी आणि जजनी निकाल देण्यासाठी वेळ मागून घ्यावा, तशी माझी अवस्था झाली आहे. दोन्ही बाजू गुणवत्तेवर मांडल्या आहेत. त्यामुळे मला निर्णय घेण्यास १५ दिवस लागणार असल्याचे सांगून बैठक संपविली.कोणावरही अन्याय होणार नाही : मुख्यमंत्रीदोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दोन्ही बाजूंनी कितीही युक्तिवाद केला तरी कोणाचे समाधान होणार नाही. दोन्ही बाजंूनी आपली बाजू गुणवत्तेवर आधारित मांडली आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली तर ग्रामीण भागावर कर वाढणार का, शहराच्या विकासाचे काय मुद्दे आहेत? याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मी व्यक्तीश: हे अधिवेशन संपल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या तीन ते चार लोकांशी बोलून गुणवत्तेच्या निकषावर निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.एका टेबलावर बसून दोन्ही गट इतक्या सामंजस्याने चर्चा करतात, आपली बाजू मांडत आहात, यावरून आपले संबंध अद्यापही चांगले आहेत. त्यामुळे हे संबंध बिघडणार नाहीत, याकरिता हद्दवाढीसंदर्भात कोणताही निर्णय घेताना कोणावर अन्याय होणार नाही. तसेच तो कोणाच्या दबावाखालीही घेतला जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत विनाकारण ग्रामीण जनतेत गैरसमज पसरवला जात आहे. औद्योगिक विकास व्हायचा असेल, तर हद्दवाढ आवश्यक आहे. - राजेश क्षीरसागर, आमदार कोल्हापूर शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही. हद्दवाढी-संदर्भात एकतर्फी निर्णय घेऊन नये. त्याआधी ग्रामीण जनतेला विश्वासात घ्यावे. - अमल महाडिक, आमदार