शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डेक्कन चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: January 1, 2016 00:09 IST

इचलकरंजीत अतिक्रमण हटाव मोहीम : मद्याच्या बाटल्यांचा ढिगारा

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवर डेक्कन मिल परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चायनीज गाडे, चहाच्या, पानाच्या टपऱ्या, कपड्यांचे स्टॉल, किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे सतत गजबजलेल्या या स्टेशन रोडने गुरुवारी मोकळा श्वास घेतला. दरम्यान, चायनीज, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यांच्या बाटल्या सापडल्याने शहरात ओपन बार खुलेआम सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले.नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत येथील मुख्य रस्त्यावरील कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविण्याबरोबरच फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू आहे. येथील स्टेशन रोडवर अतिक्रमणांचा अतिरेक झाला होता. आधीच अरुंद रस्ता आणि त्यात अतिक्रमणे, यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे हटविली जात नव्हती. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना येता-जाता जीव मुठीत धरूनच जावे लागत असे. या भागातील फुटपाथही विविध प्रकारच्या स्टॉल्स्नी व्यापला होता.अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने डेक्कन मिल चौकापासून गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे आणि कायमस्वरूपी ठाण मांडलेली दुकाने, स्टॉल्स् काढून ते जप्त करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी याठिकाणी चायनीज गाड्यांच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षित भिंतीच्या पिछाडीस मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मद्यांच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. अतिक्रमण हटाव मोहिमेत आतापर्यंत बहुतांश ठिकाणी खुलेआम ओपन बार सुरू असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रत्येक ठिकाणी मद्यांच्या बाटल्यांचा खच सापडला आहे. त्यामुळे या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अशा ठिकाणी कारवाई करून या ओपन बारला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी : प्रज्ञा पोतदारअतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार म्हणाल्या, शहरात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा वाढू नये, म्हणून दर महिन्याला कोणतेही आठ दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात जर पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पोतदार यांनी यावेळी दिला.