शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत व जिल्हाधिकाºयांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंत्री खोत म्हणाले, महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कजर्माफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नवनवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन नीळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय), सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी, नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृद्धी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. लीला सुनील महापुरे यांचा, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाºया अमित दळवी, राजू सूर्यवंशी, पॉवर फॉर पीपल्स फाऊंडेशन (गारगोटी), इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.जिल्ह्यातील २१६ पाणंद रस्ते झाले मोकळेसातबारा संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून ३ लाख ६९ हजार ५२ दाखले वितरित करण्यात आले तर जवळपास २४० किलोमीटर लांबीचे २१६ अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. त्याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्णात रस्ते सुधारणा, रूंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे, असे खोत यांनी सांगितले.२९, ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियानगेल्या तीन वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून २९ व ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खोत यांनी केले.‘जलयुक्त’मधून ९ हजार टीसीएम पाणीजिल्ह्णात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत ५२ कोटी रुपये खर्च करून १ हजार ६८८ कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यातून सुमारे ९ हजार टीसीएमपेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे खोत यांनी सांगितले.