शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत व जिल्हाधिकाºयांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंत्री खोत म्हणाले, महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कजर्माफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नवनवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन नीळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय), सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी, नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृद्धी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. लीला सुनील महापुरे यांचा, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाºया अमित दळवी, राजू सूर्यवंशी, पॉवर फॉर पीपल्स फाऊंडेशन (गारगोटी), इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.जिल्ह्यातील २१६ पाणंद रस्ते झाले मोकळेसातबारा संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून ३ लाख ६९ हजार ५२ दाखले वितरित करण्यात आले तर जवळपास २४० किलोमीटर लांबीचे २१६ अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. त्याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्णात रस्ते सुधारणा, रूंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे, असे खोत यांनी सांगितले.२९, ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियानगेल्या तीन वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून २९ व ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खोत यांनी केले.‘जलयुक्त’मधून ९ हजार टीसीएम पाणीजिल्ह्णात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत ५२ कोटी रुपये खर्च करून १ हजार ६८८ कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यातून सुमारे ९ हजार टीसीएमपेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे खोत यांनी सांगितले.