शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कर्जमाफीत भाजपचे पितळ उघडे पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली असली तरी अर्जासाठी आॅनलाईन ठेवलेली पद्धती क्लिस्ट व तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे प्रत्यक्षात सात ते आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल. ज्यामुळे भाजप सरकारचे पितळ उघडे पडेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.कृषी कर्जमाफीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी घोषित केली असली तरी अर्जासाठी आॅनलाईन ठेवलेली पद्धती क्लिस्ट व तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे प्रत्यक्षात सात ते आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल. ज्यामुळे भाजप सरकारचे पितळ उघडे पडेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.कृषी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, एक कोटी अर्ज दाखल झाले, तर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या म्हणण्यानुसार ७० लाख अर्ज मिळाले. प्रत्यक्षात मात्र ५३ लाख शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज केल्याचे दिसते आहे. यामुळे गोंधळ उडाला आहे. तरी सरकारने कृषी कर्जमाफीच्या अर्जांचा नेमका आकडा जाहीर करावा, अशी मागणी करून खासदार शेट्टी म्हणाले, आॅनलाईन अर्जासाठी जाचक अटी लावण्यात आल्या. आॅनलाईनवर तांत्रिक अडचणी जादा असल्यामुळे शेतकरी अर्ज भरताना त्रस्त झाले आहेत. कुटुंबाला एकच अर्ज भरण्याची अट असून, महिलांना प्राधान्य आहे. हे शासनाला माहीत असूनसुद्धा शासन मखलाशी करीत आहे. पती-पत्नी दोघेही शेतकरी असल्याबाबत दोघांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. शासनाच्या अशा या प्रकारच्या वागणुकीमुळे कर्जबाजारी शेतकºयांना अपमानास्पद कर्जमाफी दिली जात आहे, अशी टीका करून खासदार शेट्टी यांनी, शासनाला कृषी कर्जमाफीचा फार्स करावयाचा आहे, असा आरोप केला.ऊस दर शेतकरीच ठरवतीलऊस दर मीच ठरविणार, असे कुणी म्हणू नये. आणि माझासुद्धा तसा दावा नाही. कारण गेली अनेक वर्षे उसाचा दर शेतकरीच ठरवीत आला आहे. यंदासुद्धा उसाचा दर शेतकरीच ठरवतील, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खासदार शेट्टी यांनी केली.संघटनेला भगदाड पडेल, म्हणून घाबरलो?शेतकºयांच्या नव्या संघटनेच्या घोषणेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भगदाड पडेल, म्हणून मी घाबरलो होतो, अशी उपरोधिक टीका करताना शेट्टी यांनी, पण भगदाड वगैरे काही दिसत नाही, असे सांगितले.१७ वी ऊसपरिषद लवकरच१ आॅक्टोबरला बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे होणाºया भात परिषदेमध्ये १७ व्या ऊस परिषदेची तारीख घोषित करण्यात येईल. ज्या ऊस परिषदेमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे शेतकरी आपल्या उसाचा दर निश्चित करतील, असेही ते म्हणाले.शेतकºयांची दिल्ली परिषद यशस्वी होईलदेशातील सर्वच शेतकरी त्रस्त आहेत. भाषिक, प्रांतिक, धर्म-जात या भिंती भेदून २० नोव्हेंबरला शेतकरी नवी दिल्लीला आपली एकजूट दाखवतील. देशव्यापी होणारी ही शेतकºयांची परिषद शेतकºयांच्या एकजुटीमुळे यशस्वी होईल, असा विश्वास शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.