शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

२७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:10 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांना लाभ झाला आहेत. त्याचा सातबारा कोरा झाल्याने ते कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना १२४ कोटी १३ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासह १ लाख ९६ हजार शेतकºयांना ४१४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.शेतीमालाला अपेक्षित ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांना लाभ झाला आहेत. त्याचा सातबारा कोरा झाल्याने ते कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना १२४ कोटी १३ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासह १ लाख ९६ हजार शेतकºयांना ४१४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने पिकांचा उत्पादन खर्च अंगावर, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडले होते. कर्जाच्या बोजाखाली सापडलेल्या राज्यातील शेतकºयांना आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली.दीड लाखांपर्यंतच्या थकीत शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ आणि दीड लाखांवरील थकबाकीदारांना एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) आणली. केवळ थकबाकीदार शेतकºयांना आधार न देता अनेक अडचणींवर मात करीत प्रत्येक वर्षी कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना परतफेडीच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानदेण्याची घोषणा केली. शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. याला शेतकºयांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांशी संलग्न साडेचार लाख शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यातील सर्वाधिक २ लाख ५७ हजार शेतकरी हे जिल्हा बॅँकेशी संलग्न होते. या अर्जांची छाननी, बदललेल्या निकषांनुसार झालेली फेरछाननी आणि अंंतिम पात्र शेतकरी करण्याच्या प्रक्रियेस प्रशासनाच्या पातळीवर विलंब झाला. विविध छानन्या, नियमांचा अडथळा शेतकºयांना पार करावा लागला.वर्षभराच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ९६ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. कर्जमाफीच्या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांचा सातबारा कोरा झाला असून, ते पूर्णपणे कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकºयांना १२४ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे. यामध्ये दीड लाखापर्यंतच्या २५ हजार ९०२ शेतकºयांना १०२ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे; तर दीड लाखावरील १९७० शेतकºयांना ‘ओटीएस’ योजनेतून २२ कोटींचा लाभ झाला आहे.७८ हजार शेतकºयांना अद्याप प्रतीक्षाजिल्ह्यातून कर्जमाफीसाठी दाखल झालेले अर्ज आणि आतापर्यंत मिळालेली कर्जमाफी पाहता अद्याप ७८ हजार ८०० शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.निकषांच्या चाळणीत हे शेतकरी अडकले असून त्यांना पात्र करण्यासाठी निकषांत शिथिलता आणावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.