शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

दलबदलूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी

मांजर्डे : इतर पक्षांतून महायुतीत येणाऱ्यांवर नियंत्रण व लक्ष ठेवले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले तरच आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आरवडे (ता. तासगाव) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.आरवडे येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले की, लोकसभेत मोदी लाटेवर स्वार होऊन आज अनेकजण महायुतीत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा दलबदलूंवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात यावी. राज्यातील जनतेला काँग्रेस आघाडीने फसवले आहे. सहकार मोडीत काढण्याचे पाप केले आहे. ७००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शरद पवार शेतकऱ्यांऐवजी कारखानदार, घोटाळेबहाद्दरांना संरक्षण देऊन राजकारण करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीची वाताहत होईल. महायुतीत सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्षाचा झेंडा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय चर्चेतून घेऊ.महेश खराडे म्हणाले की, गृहमंत्री पाटील यांनी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना करताना स्वत:च्या मतदार संघातील काम लवकर केले. परंतु शेजारच्या मतदार संघातील काम मागे ठेवून विसापूर भागातील जनतेवर अन्याय केला आहे. संदीप राजोबा, सयाजी मोरे, बी. जी. पाटील, प्राचार्य प्रकाश जाधव, जोतिराम जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, मिरज तालुकाध्यक्ष महावीर पाटील, जयकुमार कोले, हरिष खराडे, पोपट मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)एका व्यासपीठावर या...खा. पाटील म्हणाले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे भुलवून निवडणुका लढविल्या आहेत. ज्या जनतेने जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले, त्या जनतेवर त्यांनी मानसिक गुलामगिरी लादली आहे. विसापूर-पुणदी योजना, तासगाव कारखान्याबाबत त्यांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करावी.