शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दलबदलूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी

मांजर्डे : इतर पक्षांतून महायुतीत येणाऱ्यांवर नियंत्रण व लक्ष ठेवले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले तरच आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आरवडे (ता. तासगाव) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.आरवडे येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले की, लोकसभेत मोदी लाटेवर स्वार होऊन आज अनेकजण महायुतीत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा दलबदलूंवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात यावी. राज्यातील जनतेला काँग्रेस आघाडीने फसवले आहे. सहकार मोडीत काढण्याचे पाप केले आहे. ७००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शरद पवार शेतकऱ्यांऐवजी कारखानदार, घोटाळेबहाद्दरांना संरक्षण देऊन राजकारण करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीची वाताहत होईल. महायुतीत सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्षाचा झेंडा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय चर्चेतून घेऊ.महेश खराडे म्हणाले की, गृहमंत्री पाटील यांनी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना करताना स्वत:च्या मतदार संघातील काम लवकर केले. परंतु शेजारच्या मतदार संघातील काम मागे ठेवून विसापूर भागातील जनतेवर अन्याय केला आहे. संदीप राजोबा, सयाजी मोरे, बी. जी. पाटील, प्राचार्य प्रकाश जाधव, जोतिराम जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, मिरज तालुकाध्यक्ष महावीर पाटील, जयकुमार कोले, हरिष खराडे, पोपट मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)एका व्यासपीठावर या...खा. पाटील म्हणाले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे भुलवून निवडणुका लढविल्या आहेत. ज्या जनतेने जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले, त्या जनतेवर त्यांनी मानसिक गुलामगिरी लादली आहे. विसापूर-पुणदी योजना, तासगाव कारखान्याबाबत त्यांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करावी.