शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर अर्बन बँकेत वाद

By admin | Updated: January 5, 2017 01:08 IST

संचालक मंडळात उभी फूट : ४० लाख जादा मोजून सॉफ्टवेअरचा घाट

विश्वास पाटील --कोल्हापूरच्या सहकारी बँकिंग क्षेत्राचे वैभव असलेल्या व राजर्षी शाहू महाराजांनीच स्थापन केलेल्या शतकमहोत्सवी कोल्हापूर अर्बन बँकेत सध्या सॉफ्टवेअर खरेदीचा वाद विकोपाला गेला आहे. तब्बल ४० लाखाहून जास्त किंमत मोजून ही खरेदी करण्यात येत असल्याने त्यास सहा संचालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळातही उभी फूट पडली आहे. खरेदीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतही त्यावरून जोरात वादंग झाल्याचे समजते.जुन्या-नव्या शाखांसाठी हे सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी एका कंपनीकडून १ कोटी ७६ लाख व दुसऱ्या कंपनीकडून २ कोटी ३० लाख रुपयांची निविदा आली आहे. ‘कारभारी’ संचालक असलेल्या काही मंडळींचा २ कोटी ३० लाख रुपये किमतीचे सॉफ्टवेअर घेण्याचा प्रयत्न आहे. जे सॉफ्टवेअर कमी किमतीत मिळू शकते ते जादा रक्कम मोजून आपण का घेत आहोत, अशी विचारणा करणारे पत्र संचालक उमेश निगडे यांनी बँकेला ९ व १३ डिसेंबरला दिले होते. निगडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पत्र दिल्यावर त्यांनी ‘मी तुम्हंला माहिती देण्यास बांधील नाही, तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही बँकेच्या अध्यक्षांकडून घेऊ शकता’ असे उर्मट प्रत्त्युतर दिल्याचे निगडे यांचे म्हणणे आहे. याच रागातून निगडे यांनी बँकेच्या आयटी कमिटीचाही ९ डिसेंबरला राजीनामा दिला. आता ‘कारभारी’ संचालक ४० लाख रुपये कमी करून त्याच आपल्या संबंधित कंपनीला हे सॉफ्टवेअरचे काम देण्याच्या प्रयत्नात आहेत.बँकेला रिझर्व्ह बँकेकडून नव्याने सहा शाखा सुरू करण्याची परवानगी दिल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काही संचालक ‘नोकर भरती’च्या नावाखाली पैसे गोळा करू लागल्याच्या तक्रारी आहेत. ‘सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व’ अशी ओळख मानले जाणारे दिवंगत शामराव शिंदे असेपर्यंत पैसे घेऊन नोकरभरती असा व्यवहार बँकेत कधीच झाला नाही. त्यामुळेही नाराजी आहे. पाच-सहा लाख रुपये त्यासाठी दर काढण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे.दृष्टिक्षेपात बँकराजर्षी शाहू महाराज व संस्थानचे महसूलमंत्री भास्करराव जाधव यांच्याकडून १९१३ ला स्थापना.बँकेचा शताब्दी महोत्सव १८ जानेवारी 2013ला शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न.वार्षिक उलाढाल : ७०० कोटीशाखा : १३कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्यएटीएम : सात ठिकाणीस्वनिधी : १०० कोटीनिव्वळ नफा : ७ कोटीभांडवल पर्याप्तता प्रमाण : २३.०५ टक्के (निकषांहून चांगले)लेखापरीक्षक वर्ग : सतत ‘अ’गीता जाधव यांचा राजीनामाबँकेतील चुकीचा व्यवहार मान्य न झाल्याने गीता रणजित जाधव यांनी संचालकपदाचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे, परंतु तो मंजूर झाला नसल्याचे सांगण्यात आले.नऊ विरुद्ध सहाबँकेचे एकूण १५ संचालक असून त्यामध्ये अध्यक्ष जयसिंगराव माने, शिरीष कणेरकर, माजी महापौर पी. टी. पाटील, नामदेव कांबळे, राजन भोसले, मधुसूदन सावंत, बाबासाहेब मांगुरे, रवींद्र धर्माधिकारी आणि सुमित्रा शिंदे एका बाजूला, तर माजी महापौर शिवाजीराव कदम, उमेश निगडे, सुभाष भांबुरे, यशवंतराव साळोखे, विश्वासराव काटकर आणि गीता जाधव हे दुसऱ्या बाजूला अशी विभागणी झाली आहे.सॉफ्टवेअर कशासाठी..आता बँकेचे स्वत:चे डाटा सेंटर आहे. त्यामुळे देशातील सर्व बँकांची एटीएम या बँकेशी जोडलेली आहेत; परंतु वाढती स्पर्धा विचारात घेऊन बँक आता नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-लॉबी, टॅब बँकिंग असे कॅशलेस बँकिंगला प्राधान्य देणार असल्याने त्यासाठी हे मुख्यालयातच सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे.जिव्हाळ्याची बँक..कोल्हापुरातील ‘बहुजन समाजाची अत्यंत जिव्हाळ्याची बँक’ अशी ‘कोल्हापूर अर्बन’ बँकेची प्रतिमा आहे. ठेवीदारांचा पैसा जबाबदारीने वापरला पाहिजे, हे तत्त्व अंगीकारून बँकेची वाटचाल सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षातील त्याच्या उलट व्यवहार सुरू झाल्यानेच वाद सुरू झाला आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील ‘मराठा’, ‘बलभीम’, ‘शाहू’ अशा बँकांचे अस्तित्व कायमचे पुसले गेले आहे. त्या वाटेने या बँकेने जाऊ नये, अशी भावना मोठ्या वर्गाची आहे.