शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

साखरीनाटेत दोन मुलांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST

राजापूर : उजेडासाठी लावलेली मेणबत्ती वितळून कौलारू घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावी रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.नासीर मुदस्सर दर्वेश (वय ७) आणि त्याची बहीण फातिमा (५) या अशी मृत मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह पाहून मुदस्सर यांचा मित्र ...

राजापूर : उजेडासाठी लावलेली मेणबत्ती वितळून कौलारू घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावी रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.नासीर मुदस्सर दर्वेश (वय ७) आणि त्याची बहीण फातिमा (५) या अशी मृत मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह पाहून मुदस्सर यांचा मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांचाही मृत्यू झाला. दोन्ही मृत मुलांचा दफनविधी सोमवारी पहाटेच करण्यात आला.दोन-तीन दिवस साखरीनाटेत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने घरात मेणबत्ती लावून मुदस्सर दर्वेश पत्नीसह शेजारी कार्यक्रमासाठी गेले होते. नासीर आणि फातिमा ही त्यांची मुले घरातच झोपली होती. मुदस्सर यांचे वडील बाहेरील पडवीत झोपले होते. रात्री दहाच्या दरम्यान मेणबती वितळून खाली पडून अंथरुणाने पेट घेतला असावा. मुदस्सर यांचा घरातच टेलरिंग व्यवसाय असल्याने घरात मोठ्या प्रमाणावर कापड होते. या कापडाने पेट घेतला आणि घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच आजुबाजूचे लोक घटनास्थळी धावून आले. पाणी तसेच बांधकामासाठीची वाळू घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात आल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वजण हादरले. नासीर आणि फातिमा आगीत होरपळून मृत्यू पावले होते. त्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दोन्ही मृत मुलांच्या देहाचा पंचनामा करून सोमवारी पहाटे त्यांचे दफन करण्यात आले. नासीर आणि फातिमा नाटे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. त्यांच्या मृत्युमुळे हायस्कूलवरही शोककळा पसरली आहे. आमदार राजन साळवी हे कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी तेथूनच झाल्या घटनेची तत्काळ माहिती घेतली. राजापूरचे सभापती अभिजित तेली, माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.मानसिक धक्क्याने एकाचा मृत्यूही घटना पाहणारे मुदस्सर यांचे मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरीला व तेथून कोल्हापूरला पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचाही मृतदेह नंतर साखरीनाट्याकडे आणण्यात आला.