शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

साखरीनाटेत दोन मुलांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST

राजापूर : उजेडासाठी लावलेली मेणबत्ती वितळून कौलारू घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावी रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.नासीर मुदस्सर दर्वेश (वय ७) आणि त्याची बहीण फातिमा (५) या अशी मृत मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह पाहून मुदस्सर यांचा मित्र ...

राजापूर : उजेडासाठी लावलेली मेणबत्ती वितळून कौलारू घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावी रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.नासीर मुदस्सर दर्वेश (वय ७) आणि त्याची बहीण फातिमा (५) या अशी मृत मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह पाहून मुदस्सर यांचा मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांचाही मृत्यू झाला. दोन्ही मृत मुलांचा दफनविधी सोमवारी पहाटेच करण्यात आला.दोन-तीन दिवस साखरीनाटेत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने घरात मेणबत्ती लावून मुदस्सर दर्वेश पत्नीसह शेजारी कार्यक्रमासाठी गेले होते. नासीर आणि फातिमा ही त्यांची मुले घरातच झोपली होती. मुदस्सर यांचे वडील बाहेरील पडवीत झोपले होते. रात्री दहाच्या दरम्यान मेणबती वितळून खाली पडून अंथरुणाने पेट घेतला असावा. मुदस्सर यांचा घरातच टेलरिंग व्यवसाय असल्याने घरात मोठ्या प्रमाणावर कापड होते. या कापडाने पेट घेतला आणि घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच आजुबाजूचे लोक घटनास्थळी धावून आले. पाणी तसेच बांधकामासाठीची वाळू घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात आल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वजण हादरले. नासीर आणि फातिमा आगीत होरपळून मृत्यू पावले होते. त्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दोन्ही मृत मुलांच्या देहाचा पंचनामा करून सोमवारी पहाटे त्यांचे दफन करण्यात आले. नासीर आणि फातिमा नाटे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. त्यांच्या मृत्युमुळे हायस्कूलवरही शोककळा पसरली आहे. आमदार राजन साळवी हे कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी तेथूनच झाल्या घटनेची तत्काळ माहिती घेतली. राजापूरचे सभापती अभिजित तेली, माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.मानसिक धक्क्याने एकाचा मृत्यूही घटना पाहणारे मुदस्सर यांचे मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरीला व तेथून कोल्हापूरला पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचाही मृतदेह नंतर साखरीनाट्याकडे आणण्यात आला.