कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या घटल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नवे १०९० रुग्ण आढळले असून मृत्यू संख्याही २८ वर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आकडे कमी आल्याने याचीही चर्चा सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या कमी आल्याने लोकांनी देव पावला, अशीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली.
कोल्हापूर शहरात २९२ जणांना कोरोनाची लागण झाली असून करवीर तालुक्यात १४४ तर हातकणंगले तालुक्यात ११४ जणांना लागण झाली आहे. गगनबावडा तालुक्यात पहिल्यापासूनच रुग्ण कमी असून मंगळवारी संपलेल्या २४ तासात केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे.
करवीर तालुक्यात सर्वाधिक ९ मृत्यू झाले असून त्याखालोखाल कोल्हापूर शहरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत चाचण्या वाढवण्याच्या आणि संपर्कशोध मोहीम गतिमान करण्याच्या सक्त सूचना दिल्यामुळे संख्या वाढणार का, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
चौकट
करवीर ०९
गडमुडशिंगी, आरकेनगर २, मांद्रे, पाचगाव, वडकशिवाले, वडणगे, बेले, मोरेवाडी
कोल्हापूर ०८
नेहरूनगर, नाना पाटीलनगर, लक्षतीर्थ वसाहत २, संभाजीनगर २, मंगळवार पेठ, हरिपूजापूरम
हातकणंगले ०२
कुंभोज, तळंदगे
चंदगड ०२
माणगाव, हेरे
इचकरंजी ०२
कागल ०१
शिरोळ ०२
जयसिंगपूर २
इतर ०२
बेळगाव, गोठेवाडी सिंधुदुर्ग