शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

शिरटेच्या माहेरवाशीणीने मृत्यूनंतर दिले चारजणांना जीवदान

By admin | Updated: April 2, 2017 23:31 IST

जाताना जिंकली हजारो मने : मुलुंडमधील ६२ वर्षीय महिलेला बसविले हृदय, तर पुण्यातील रुग्णास किडनी दान

निवास पवार ल्ल शिरटेशिरटे (ता. वाळवा) येथील ५0 वर्षीय सौ. संगीता आनंदराव सावंत यांनी अपघातात आपले जीवन गमावले. मात्र अशा अखेरच्या क्षणातही प्रत्येकाचे जीवन अमूल्य आहे, याची जाणीव ठेवत हृदय, दोन किडन्या व यकृत अशा अवयवांचे दान करून मृत्यूपश्चातही आपण जीवनदूत बनू शकतो, असा आदर्श वस्तूपाठ घालून दिला. संगीता सावंत यांच्या या कृतीने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ ही उक्ती सार्थ ठरली. पतीने लष्करातून देशाची सेवा केली, तर या माऊलीने चारजणांना जीवनदान देऊन मानव कल्याणाच्या सेवेत एक पाऊल पुढे टाकले. संगीता सावंत यांचे शिरटे (ता. वाळवा) हे माहेर, तर कऱ्हाड तालुक्यातील कापिल हे सासर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सध्या त्या पुणे येथे वास्तव्यास होत्या. संगीता यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्या पतीसोबत कमांडो रुग्णालयात गेल्या होत्या.तेथून औषधोपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना मुंढवा-हडपसर मार्गावर मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी बिर्ला रुग्णालयात दाखल केले. १९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्या शुध्दीवर आल्याच नाहीत. विविध उपचार करूनही त्यांच्या शरीराने कसलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत ३० मार्च रोजी मालवली.संगीता यांनी मरणोत्तर अवयव दान करण्याची इच्छा त्यांच्या कुटुंबियांना वारंवार बोलून दाखवली होती. त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय सावंत कुटुंबियांनी मोठ्या धिराने घेतला. त्यांची एक किडनी बिर्ला येथील रुग्णालय, दुसरी किडनी व यकृत रुबी हॉल रुग्णालयातील गरजूंना बसविण्यात आली, तर मुलुंड फोर्टीस रुग्णालयातील ६२ वर्षीय महिलेला संगीता सावंत यांचे हृदय बसविण्यात आले आहे. त्यांच्या या अवयव दानामुळे चारजणांचे प्राण वाचले आहेत. त्या जरी आज या जगात नसल्या तरी, त्यांच्या अवयव दानामुळे त्या नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहणार आहेत.मुंबईपर्यंत ग्रीन कॅरिडॉरसंगीता सावंत यांचे हृदय पुण्याहून मुंबईला नेण्यासाठी विमानतळापर्यंतचे २६ कि. मी. चे अंतर अवघ्या २२ मिनिटात पोलिसांच्या सहकार्याने ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून पार करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमध्ये ७ पोलिस अधिकारी व ५८ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.