शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

By admin | Updated: April 6, 2016 00:33 IST

महापौरांची प्रशासनास सूचना : आज सायंकाळी महापालिकेत बैठक; सावळा गोंधळ उघड

कोल्हापूर : दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना उपसा मात्र नेहमीप्रमाणेच होत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांसह महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचेही डोळे उघडले. त्यावर महापौर अश्विनी रामाणे यांनी तातडीने पाणीवाटपाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरास सुयोग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेत प्रमुख पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोल्हापूर शहरास १ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; तरीही नेहमीएवढाच पाणी उपसा आजही होत असल्यामुळे ‘दिवसाआडची मोट जमेना’या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त छापून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा हेतू साध्य होत नसल्याची बाब समोर आणली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व पदाधिकारीही चकित झाले. पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे महापौर रामाणे यांनी मंगळवारी तातडीने आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि नियोजनात काही कमतरता असतील तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी सूचना केली. (प्रतिनिधी) उपनगरात अपुरा पाणीपुरवठा शहराच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होतो; तर उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याची कमतरता जाणवते; त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पाणीगळती काढण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. तरीही शहरातील गळती काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पाणीटंचाईच्या कामात प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये, असेही महापौर रामाणे यांनी म्हटले आहे.नियोजनात त्रुटीएक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात त्रुटी असल्यामुळे काही भागांतील नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आजही उपनगरांत रात्री-अपरात्री आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. काही भागांत रात्री पाणी सोडले की ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते. गरज नसतानाही जादा पाणी देण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाणीवाटपाचे नियोजन चुकले असल्याची भावना बळावत आहे.टॅँकरद्वारे पाणीपुरवठाशहरात ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी टॅँकरचा वापर होत आहे. महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे दोन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टॅँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना ओढाताण करावी लागत आहे. टॅँकरची प्रतीक्षा आणि तो येताच उडणारी धावपळ आता नागरिकांच्या अंगवळणी पडत आहे.