शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

By admin | Updated: April 6, 2016 00:33 IST

महापौरांची प्रशासनास सूचना : आज सायंकाळी महापालिकेत बैठक; सावळा गोंधळ उघड

कोल्हापूर : दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना उपसा मात्र नेहमीप्रमाणेच होत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांसह महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचेही डोळे उघडले. त्यावर महापौर अश्विनी रामाणे यांनी तातडीने पाणीवाटपाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरास सुयोग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेत प्रमुख पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोल्हापूर शहरास १ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; तरीही नेहमीएवढाच पाणी उपसा आजही होत असल्यामुळे ‘दिवसाआडची मोट जमेना’या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त छापून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा हेतू साध्य होत नसल्याची बाब समोर आणली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व पदाधिकारीही चकित झाले. पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे महापौर रामाणे यांनी मंगळवारी तातडीने आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि नियोजनात काही कमतरता असतील तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी सूचना केली. (प्रतिनिधी) उपनगरात अपुरा पाणीपुरवठा शहराच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होतो; तर उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याची कमतरता जाणवते; त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पाणीगळती काढण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. तरीही शहरातील गळती काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पाणीटंचाईच्या कामात प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये, असेही महापौर रामाणे यांनी म्हटले आहे.नियोजनात त्रुटीएक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात त्रुटी असल्यामुळे काही भागांतील नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आजही उपनगरांत रात्री-अपरात्री आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. काही भागांत रात्री पाणी सोडले की ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते. गरज नसतानाही जादा पाणी देण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाणीवाटपाचे नियोजन चुकले असल्याची भावना बळावत आहे.टॅँकरद्वारे पाणीपुरवठाशहरात ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी टॅँकरचा वापर होत आहे. महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे दोन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टॅँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना ओढाताण करावी लागत आहे. टॅँकरची प्रतीक्षा आणि तो येताच उडणारी धावपळ आता नागरिकांच्या अंगवळणी पडत आहे.