शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

By admin | Updated: April 6, 2016 00:33 IST

महापौरांची प्रशासनास सूचना : आज सायंकाळी महापालिकेत बैठक; सावळा गोंधळ उघड

कोल्हापूर : दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना उपसा मात्र नेहमीप्रमाणेच होत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांसह महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचेही डोळे उघडले. त्यावर महापौर अश्विनी रामाणे यांनी तातडीने पाणीवाटपाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरास सुयोग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेत प्रमुख पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोल्हापूर शहरास १ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; तरीही नेहमीएवढाच पाणी उपसा आजही होत असल्यामुळे ‘दिवसाआडची मोट जमेना’या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त छापून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा हेतू साध्य होत नसल्याची बाब समोर आणली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व पदाधिकारीही चकित झाले. पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे महापौर रामाणे यांनी मंगळवारी तातडीने आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि नियोजनात काही कमतरता असतील तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी सूचना केली. (प्रतिनिधी) उपनगरात अपुरा पाणीपुरवठा शहराच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होतो; तर उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याची कमतरता जाणवते; त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पाणीगळती काढण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. तरीही शहरातील गळती काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पाणीटंचाईच्या कामात प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये, असेही महापौर रामाणे यांनी म्हटले आहे.नियोजनात त्रुटीएक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात त्रुटी असल्यामुळे काही भागांतील नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आजही उपनगरांत रात्री-अपरात्री आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. काही भागांत रात्री पाणी सोडले की ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते. गरज नसतानाही जादा पाणी देण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाणीवाटपाचे नियोजन चुकले असल्याची भावना बळावत आहे.टॅँकरद्वारे पाणीपुरवठाशहरात ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी टॅँकरचा वापर होत आहे. महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे दोन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टॅँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना ओढाताण करावी लागत आहे. टॅँकरची प्रतीक्षा आणि तो येताच उडणारी धावपळ आता नागरिकांच्या अंगवळणी पडत आहे.