शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकीच्या बळाने दसरा चौक तळपला

By admin | Updated: October 16, 2016 00:11 IST

सकल मराठा मोर्चा : ‘एक मराठा... लाख मराठा’ घोषणांचे लक्षवेधी फलक; मराठा अस्मितेचा सूर्य

कोल्हापूर : ‘एक मराठा... लाख मराठा’ अशी घोषणा लिहिलेल्या भगव्या टोप्या, हातात फडकणारा भगवा ध्वज, अंगावर निषेधाचा काळा टी शर्ट आणि न्याय्य मागण्यांचा हुंकार घेऊन कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठ्यांच्या अस्मितेचा सूर्य तळपला. जो परिसर राजर्षी शाहू महाराजांनी वसविलेल्या विविध जाती-धर्मांच्या वसतिगृहांनी पवित्र झाला आहे, त्याच मातीला साक्षी ठेवून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली. आम्ही आतापर्यंत शांत राहिलो म्हणून आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देतानाच समाजाच्या एकजुटीची वज्रमूठही आवळली. ही एकी मोर्चापुरती न ठेवता समाजाच्या सुख-दु:खात यापुढेही अशीच ठेवण्याची हाकही दिली गेली. कोल्हापूरच्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष होते, परंतु कोणतेही गालबोट न लागू देता अगदी शांततेतच कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासात जनसमुदायाचा कायम अबाधित राहील, असा विक्रम नोंदवीत हा मोर्चा दुपारी एक वाजता संपला. कोल्हापूरची कोणतीही गोष्ट जगावेगळी असते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याचेच प्रत्यंतर मराठा मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा शनिवारी आले. एकदा मनावर घेतले तर मग देवालाही शरण जायचे नाही, ही विजिगीषू वृत्ती या मातीत उपजतच आहे. त्यामुळे मराठा मोर्चाला ‘यायला लागतंय’ अशी हाक समाजाने दिल्यावर कोल्हापूरचे समाजजीवन हादरून गेले. कोल्हापूर आणि इतर शहरांतील मोर्चामध्ये फरक हा होता की, कोल्हापूरच्या मोर्चाची घोषणा ७ सप्टेंबरला शेकापक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत झाली. त्यामुळे तेव्हापासून जवळपास सव्वा महिना वातावरण तापत गेले. एवढा कालावधी अन्य जिल्ह्यांत तयारीसाठी मिळाला नव्हता. एखाद्या प्रश्नासाठी वातावरण कसे तापवायचे हे कोल्हापूरला कुणी सांगायची गरज नाही. टोलच्या आंदोलनाने हा ताजा धडाच घालून दिलेला होता. त्यामुळे तालमीच्या बैठका झाल्या, कोपरासभा झाल्या, गावे जागी झाली. महिला जाग्या झाल्या. तरुणाईमध्ये स्फुरण चढले. गाव असो की शहर सगळीकडे जनजागरणासाठी छोट्या-मोठ्या शेकडो बैठका झाल्या. गाड्यांवर ‘एक मराठा... लाख मराठा..’, ‘यायला लागतंय..’, ‘१५ आॅक्टोबर चलो कोल्हापूर’ अशी स्टिकर्स लागली. कोपऱ्या-कोपऱ्यांवर भगवे ध्वज फडकू लागले. चौका-चौकांत डिजिटल झळकले. पिठाच्या गिरणीपासून गावच्या चावडीपर्यंत आणि सलूनच्या दुकानापासून ते सरकारी कार्यालयापर्यंत सगळीकडे गेला महिनाभर एक आणि एकच चर्चा सुरू राहिली ती म्हणजे मराठा मोर्चा. कोणत्याही मोर्चाचे कुणी तरी करायला लागते म्हणून संयोजन समितीने ते काम केले असले, तरी लोकच स्वत:हून पुढे सरसावले होते. त्यांना तुम्ही हे करा असे कुणालाच सांगायची गरज लागली नाही. ‘आमचे बापजादे लढले मातीसाठी... आम्ही लढू आता जातीसाठी’ असे भावनिक आवाहनही मने पेटवून गेले. अखेरचे दोन दिवस तर इतकी उत्कंठा शिगेस पोहोचली होती की, कधी एकदा शनिवार येतोय आणि त्यामध्ये आपण सहभागी होतोय, असे लोकांना झाले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत निम्मे कोल्हापूर रस्त्यांवरच होते. एवढे सगळे झाल्यावर मोर्चा अभूतपूर्व निघणार नाही तरच नवल..! शनिवारचा सूर्य उगवला तोच भगवी किरणे घेऊन. सकाळी हलकी थंडी होती, काही भागांत धुकेही होते; परंतु शहराला जाग आली. उठलेला मावळा मोर्चाला जायच्या तयारीला लागला. सकाळी सात-सव्वासातच्या सुमारासच रस्ते चालू लागले. गाड्या येऊ लागल्या. शहराच्या वेशीवर नऊ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती. बघता-बघता पार्किंग फुल्ल झाले. शहराच्या चोहोबाजूंनी लोकांचे लोट पंचगंगेच्या महापुरासारखे वाहू लागले. साधारणत: नऊ ते दहापर्यंत तुलनेत लोकांचा ओघ कमी होता. कारण सकाळी गावांतून बाहेर पडून कोल्हापूरपर्यंत यायला काही कालावधी गेला. दहानंतर मात्र मोर्चाच्या मार्गावर मुंगी शिरायलाही वाव नव्हता. लोक नुसते मूकपणे चालत होते. कोणतीही घोषणा नव्हती, की कुणाबद्दल राग-द्वेष, त्वेष नव्हता. शाहूंच्या सावलीत शाहू... मोर्चामध्ये छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चातील रणरागिणींची भाषणे सुरू झाली तेव्हा उन्हाचा तडाखा होता. त्यावेळी शाहू महाराज दसरा चौकातील मुख्य व्यासपीठावर राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या खाली बसून होते. उपस्थित मान्यवर मुख्य व्यासपीठ परिसरात महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, बेळगावच्या महापौर सरिता पाटील, आमदार संभाजी पाटील, संयोगीताराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, प्रा. जयंत पाटील, प्रा. मधुकर पाटील, फत्तेसिंह सावंत, डॉ. संदीप पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते. सकाळी सातपासून महिलांचे जथ्थे मोर्चाचे केंद्र दसरा चौक असल्याने येथून चोहोबाजूंनी पाचशे मीटर परिसर महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून मोर्चासाठी महिला झुंडीने दसरा चौकात दाखल होत होत्या. भगव्या साड्या आणि डोक्यावर ‘एक मराठा, लाख मराठा’ लिहिलेली भगवी टोपी घातलेल्या महिला, मराठा क्रांती मोर्चा लिहिलेले टी-शर्ट घातलेल्या तरुणी हातात भगवे झेंडे घेऊन दसरा चौकात दाखल होत होत्या. मोर्चानंतर ‘सेल्फी’ मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला तो