शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तहान भागविण्यासाठी अंधार अपरिहार्य!

By admin | Updated: April 2, 2016 00:19 IST

‘कोयना’ आटू लागले : केवळ ३८.८४ टीएमसीच पाणी शिल्लक; सिंचनासाठी पाणी सोडण्याची सांगली पाटबंधारे विभागाची मागणी

सागर गुजर -- सातारा  -कोयना धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. कोयनेचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी सांगली जिल्ह्यातून होत आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला तर वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवलेले २९.१२ टीएमसी पाणी नदीत सोडावे लागणार आहे, त्यामुळे भविष्यातील वीजनिर्मितीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पातून वर्षाकाठी ३ हजार ३३७ दशलक्ष युनिटस इतकी वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीसाठी दरवर्षी ६७.५० टीएमसी इतके पाणी वापरले जाते. कोयनेच्या लाभक्षेत्रातून पिण्यासाठी व शेतीला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागल्याने शासनपातळीवर नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी करून ते ५२.५ टीएमसी इतके करावे, असा निर्णय झाला. वीजनिर्मितीसाठी याआधी ३८.३८ टीएमसी पाणी वापर झालेला आहे. ‘महाजनको’ने नेहमीच्या धोरणानुसार २९.१२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवले होते. मात्र, या पाण्यालाही आता कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ १४.१२ टीएमसी इतकेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे लागणार आहे. अर्थात याबाबतचा शासन आदेश झालेला नसला तरीही सांगलीकरांच्या मागणीनुसार धरणातून कोयना नदीत पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले आहे. धरणाची साठवणक्षमता १०५ टीएमसी आहे. मागील पावसाळ््यात पाऊसच अत्यल्प झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. उन्हाळी पावसानेही चकवा दिल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. साहजिकच कोयनेतील वीजनिर्मितीला कात्री बसल्यास राज्याला ऐन उन्हाळ्यात भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. धरणातील पाणी प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी सोडले जात असते. उन्हाळा तीव्र असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी सांगली पाटबंधारे विभागाची मागणी आहे. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत वीजनिर्मितीवर ६७.०५ टीएमसी पाणी वापराऐवजी ५२.५ टीएमसी पाणी वापरावे, असा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबतचे लेखी आदेश काढले गेलेले नाहीत.- वैशाली नारकर,अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग