शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

तहान भागविण्यासाठी अंधार अपरिहार्य!

By admin | Updated: April 2, 2016 00:19 IST

‘कोयना’ आटू लागले : केवळ ३८.८४ टीएमसीच पाणी शिल्लक; सिंचनासाठी पाणी सोडण्याची सांगली पाटबंधारे विभागाची मागणी

सागर गुजर -- सातारा  -कोयना धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. कोयनेचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी सांगली जिल्ह्यातून होत आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला तर वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवलेले २९.१२ टीएमसी पाणी नदीत सोडावे लागणार आहे, त्यामुळे भविष्यातील वीजनिर्मितीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पातून वर्षाकाठी ३ हजार ३३७ दशलक्ष युनिटस इतकी वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीसाठी दरवर्षी ६७.५० टीएमसी इतके पाणी वापरले जाते. कोयनेच्या लाभक्षेत्रातून पिण्यासाठी व शेतीला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागल्याने शासनपातळीवर नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी करून ते ५२.५ टीएमसी इतके करावे, असा निर्णय झाला. वीजनिर्मितीसाठी याआधी ३८.३८ टीएमसी पाणी वापर झालेला आहे. ‘महाजनको’ने नेहमीच्या धोरणानुसार २९.१२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवले होते. मात्र, या पाण्यालाही आता कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ १४.१२ टीएमसी इतकेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे लागणार आहे. अर्थात याबाबतचा शासन आदेश झालेला नसला तरीही सांगलीकरांच्या मागणीनुसार धरणातून कोयना नदीत पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले आहे. धरणाची साठवणक्षमता १०५ टीएमसी आहे. मागील पावसाळ््यात पाऊसच अत्यल्प झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. उन्हाळी पावसानेही चकवा दिल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. साहजिकच कोयनेतील वीजनिर्मितीला कात्री बसल्यास राज्याला ऐन उन्हाळ्यात भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. धरणातील पाणी प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी सोडले जात असते. उन्हाळा तीव्र असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी सांगली पाटबंधारे विभागाची मागणी आहे. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत वीजनिर्मितीवर ६७.०५ टीएमसी पाणी वापराऐवजी ५२.५ टीएमसी पाणी वापरावे, असा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबतचे लेखी आदेश काढले गेलेले नाहीत.- वैशाली नारकर,अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग