शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पाणीदार कोल्हापूरला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:39 IST

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून : पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश ...

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून :पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा तसेच भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. तापमानातील वाढ अशीच राहिल्यास मे अखेरीस जिल्ह्यातील शेकडो गावात टंचाईच्या झळा जाणवणार हे नक्की आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनानेही आतापासूनच नियोजन करण्यास सरसावले आहे.जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी हे अतिवृष्टीचे तालुके आहेत. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, सध्या या तालुक्यातील धरणात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.राधानगरी तालुक्यातील पन्नासहून अधिक वाड्या-वस्त्यांवर, चंदगडच्या आठ गावांत, आजरा तालुक्यातील २१ गावांतील वाड्या-वस्तीवर, गडहिंग्लजमधील ८९ पैकी २२ गावांत, शाहूवाडीतील १५ ते २0 धनगरवाडे, पाच ते दहा गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर करवीर तालुक्यातील ११८ गावांपैकी सहा गावांत व पाच वाड्यांमध्ये, हातकणंगलेतील ६२ पैकी १३ गावांमध्ये, भुदरगडमधील आठ गावे आणि चोवीस वाड्या-वस्त्यांना, पन्हाळा तालुक्यातील अनेक गावात, शिरोळच्या तमदलगे या गावाला टंचाई जाणवत आहे. कागल व गगनबावड्यात काही गावे टंचाईच्या काठावर असली तरी अद्याप टंचाईग्रस्त म्हणून पुढे आलेली नाहीत.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुकीच्या धकाधकीतून बाहेर पडलेल्या जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने पाणीटंचाईकडे लक्ष दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण २६ ठिकाणी नव्या कूपनलिका मंजूर केल्या आहेत. येत्या आठवड्याभरात अन्य प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे; परंतु दरवर्षी पाणीटंचाईवर उपाय म्हणून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.आॅक्टोबर महिन्यामध्ये पाणीपातळी विचारात घेऊन शासनाचा भूजल सर्वेक्षण विभाग संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे ठरवून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो. अशातच प्रांताधिकाºयांच्या अहवालाशिवाय एखाद्या गावामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती घोषित केली जात नाही. त्याचे निकष ठरलेले आहेत, तर नव्या कूपनलिकांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेने एकूण २९७ ठिकाणी पाणीटंचाईच्या उपाययोजना अवलंबण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या सर्व उपाययोजनांचे सर्वेक्षण झाल्यानंतर १५१ ठिकाणच्या उपाययोजना अयोग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला. उर्वरित १४६ पैकी ६३ ठिकाणी नव्या कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी ३६ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. त्यापैकी २६ प्रस्तावांना शुक्रवारअखेर मंजुरी देण्यात आली असून, नव्या कूपनलिकांच्या खुदाईलाही सुरुवात झाली आहे.प्रस्तावित उपाययोजनासार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन कूपनलिका, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या किंवा पूरक नळ पाणी पुरवठा योजना राबविणे, कूपनलिकांची दुरुस्ती अशा माध्यमातून टंचाईवर उपाययोजना करण्यात येते.तालुका खासगी विहिरी अधिग्रहण नवीन कूपनलिकागाव वाड्या गाव वाड्याआजरा २ 0 ५ १४भुदरगड २ ४ ४ १६चंदगड ५ ५ ७ ७गडहिंग्लज १२ २ ६ ७गगनबावडा 0 0 १ ४हातकणंगले १७ १ २ ९करवीर ३ 0 ३ ३कागल 0 0 0 २५पन्हाळा ९ ४ ३ ८राधानगरी 0 0 २ ४२शाहूवाडी ३ 0 २ ८शिरोळ ६ 0 ६ २0एकूण ५९ १६ ४१ १६३दरवर्षी तेच तेदरवर्षी याच अनेक गावांमध्ये टंचाई जाणवते. यामध्ये छोट्या छोट्या वाड्या-वस्त्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये टंचाई आहे, तर १६३ वाड्यांवर पाणीटंचाई आहे.त्यामुळे दरवर्षी तेच ते प्रस्ताव तयार करून, त्याची मंजुरी घेऊन कूपनलिका खोदण्यापेक्षा तेथे अन्य पर्याय कायमस्वरूपी देता येतात का? याचा विचार होण्याची गरज आहे.