शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

पाणीदार कोल्हापूरला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:39 IST

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून : पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश ...

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून :पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा तसेच भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. तापमानातील वाढ अशीच राहिल्यास मे अखेरीस जिल्ह्यातील शेकडो गावात टंचाईच्या झळा जाणवणार हे नक्की आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनानेही आतापासूनच नियोजन करण्यास सरसावले आहे.जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी हे अतिवृष्टीचे तालुके आहेत. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, सध्या या तालुक्यातील धरणात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.राधानगरी तालुक्यातील पन्नासहून अधिक वाड्या-वस्त्यांवर, चंदगडच्या आठ गावांत, आजरा तालुक्यातील २१ गावांतील वाड्या-वस्तीवर, गडहिंग्लजमधील ८९ पैकी २२ गावांत, शाहूवाडीतील १५ ते २0 धनगरवाडे, पाच ते दहा गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर करवीर तालुक्यातील ११८ गावांपैकी सहा गावांत व पाच वाड्यांमध्ये, हातकणंगलेतील ६२ पैकी १३ गावांमध्ये, भुदरगडमधील आठ गावे आणि चोवीस वाड्या-वस्त्यांना, पन्हाळा तालुक्यातील अनेक गावात, शिरोळच्या तमदलगे या गावाला टंचाई जाणवत आहे. कागल व गगनबावड्यात काही गावे टंचाईच्या काठावर असली तरी अद्याप टंचाईग्रस्त म्हणून पुढे आलेली नाहीत.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुकीच्या धकाधकीतून बाहेर पडलेल्या जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने पाणीटंचाईकडे लक्ष दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण २६ ठिकाणी नव्या कूपनलिका मंजूर केल्या आहेत. येत्या आठवड्याभरात अन्य प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे; परंतु दरवर्षी पाणीटंचाईवर उपाय म्हणून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.आॅक्टोबर महिन्यामध्ये पाणीपातळी विचारात घेऊन शासनाचा भूजल सर्वेक्षण विभाग संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे ठरवून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो. अशातच प्रांताधिकाºयांच्या अहवालाशिवाय एखाद्या गावामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती घोषित केली जात नाही. त्याचे निकष ठरलेले आहेत, तर नव्या कूपनलिकांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेने एकूण २९७ ठिकाणी पाणीटंचाईच्या उपाययोजना अवलंबण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या सर्व उपाययोजनांचे सर्वेक्षण झाल्यानंतर १५१ ठिकाणच्या उपाययोजना अयोग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला. उर्वरित १४६ पैकी ६३ ठिकाणी नव्या कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी ३६ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. त्यापैकी २६ प्रस्तावांना शुक्रवारअखेर मंजुरी देण्यात आली असून, नव्या कूपनलिकांच्या खुदाईलाही सुरुवात झाली आहे.प्रस्तावित उपाययोजनासार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन कूपनलिका, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या किंवा पूरक नळ पाणी पुरवठा योजना राबविणे, कूपनलिकांची दुरुस्ती अशा माध्यमातून टंचाईवर उपाययोजना करण्यात येते.तालुका खासगी विहिरी अधिग्रहण नवीन कूपनलिकागाव वाड्या गाव वाड्याआजरा २ 0 ५ १४भुदरगड २ ४ ४ १६चंदगड ५ ५ ७ ७गडहिंग्लज १२ २ ६ ७गगनबावडा 0 0 १ ४हातकणंगले १७ १ २ ९करवीर ३ 0 ३ ३कागल 0 0 0 २५पन्हाळा ९ ४ ३ ८राधानगरी 0 0 २ ४२शाहूवाडी ३ 0 २ ८शिरोळ ६ 0 ६ २0एकूण ५९ १६ ४१ १६३दरवर्षी तेच तेदरवर्षी याच अनेक गावांमध्ये टंचाई जाणवते. यामध्ये छोट्या छोट्या वाड्या-वस्त्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये टंचाई आहे, तर १६३ वाड्यांवर पाणीटंचाई आहे.त्यामुळे दरवर्षी तेच ते प्रस्ताव तयार करून, त्याची मंजुरी घेऊन कूपनलिका खोदण्यापेक्षा तेथे अन्य पर्याय कायमस्वरूपी देता येतात का? याचा विचार होण्याची गरज आहे.