शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वळणे ठरताहेत साक्षात मृत्यूचा सापळा

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : अरुंद वळणांचे रुंदीकरण, तसेच धोकादायक पुलांचे बांधकाम करण्याची वाहनधारकांची मागणी

आंबा : तालुका ठिकाणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बहिरेवाडी पूल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठवड्यात या अरुंद पुलावरून कोसळणारी सँट्रो सुदैवाने वाचली. कोकण व घाट प्रदेशाला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील अरुंद वळणांचे रुंदीकरण व धोकादायक पुलांचे बांधकाम न झाल्याने आंबा विश्रामधामपुढील हसुकीचे वळण, तळवडे डी. पी.जवळील वळण, वालूरफाटा, निळे, बहिरेवाडी, केर्ली, वाघबीळ येथील वळणे अपघाताची केंद्रे बनली आहेत. शाहूवाडीतील बहिरेवाडीचा पूल नेमका अरुंद वळणावर व दोन्ही बाजूने दरीच्या भागावर असल्याने येथे अपघात ठरलेले आहेतच. वरचेवर होणाऱ्या अपघातांमुळे पुलाचे गार्ड तुटून त्याची टोके रस्त्याच्या दिशेने वळली आहेत. सुमारे ५० फुटांच्या वक्राकार पुलावरून वाहन जाताना समोरील वाहन थांबवावे लागते. उतारावरून येणाऱ्या वाहनाला पुढचे वाहन क्रॉस होत असेल, तर बाजूपट्टी नसल्याने वाहन थेट पुलाच्या गार्डवरून थेट ५० फूट खोल कडेलोट होणे, हाच पर्याय राहतो. प्रशासनाने या वळणावरील पुलाचे रुंदीकरण करून दरीच्या भागावर सिमेंटचे संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी येथून एक किलोमीटरवरील करंजोशी गावाजवळील पुलावरून एस.टी. कोसळून नऊ प्रवासी ठार, तर वीसजण जखमी झाले होते. त्या पुलापेक्षा हा बहिरेवाडीचा पूल अधिक धोकादायक असताना संबंधित अधिकारी या पुलाची दुरवस्था नजरेआड करीत आहेत. प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पाहते का? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी या १४० किलोमीटर दरम्यान मलकापूर येथील शाळी नदीवरील पूल, भोसलेवाडी व तळवडे येथील पूल, धोपेश्वर फाट्यानजीकचा पूल, वारूळ येथील कडवी नदीवरील पुलांची उभारणी शंभर वर्षांपूर्वीची आहे.बॉक्साईट खनिज, ऊस, कोकणातून येणारे लाकूड या वाहतुकीबरोबर, पवनचक्की, कोकण रेल्वे, जैतापूर प्रकल्प, दाभोळ व फिनोलेक्स प्रकल्पांची अवजड मशिनरी, शिवाय घाटावरून बाजारपेठांना जाणारा माल, भाविक-पर्यटकांचे वाढते प्रमाण पाहता या मार्गावरचे दळणवळण वाढले आहे.सह्याद्रीचा घाटमाथा व अतिवृष्टीच्या टप्प्यातून हा रस्ता जात असल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती देणे गरजेचे आहे. सव्वाशे वर्षे होऊन गेलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे प्रस्ताव निधीअभावी धूळ खात पडले आहेत. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीसाठी निधी मिळवण्यास पाठपुरावा करावा, अशी शाहूवाडी-पन्हाळावासीयांची मागणी आहे.