शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

धोकादायक वळणे ठरताहेत साक्षात मृत्यूचा सापळा

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : अरुंद वळणांचे रुंदीकरण, तसेच धोकादायक पुलांचे बांधकाम करण्याची वाहनधारकांची मागणी

आंबा : तालुका ठिकाणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बहिरेवाडी पूल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठवड्यात या अरुंद पुलावरून कोसळणारी सँट्रो सुदैवाने वाचली. कोकण व घाट प्रदेशाला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील अरुंद वळणांचे रुंदीकरण व धोकादायक पुलांचे बांधकाम न झाल्याने आंबा विश्रामधामपुढील हसुकीचे वळण, तळवडे डी. पी.जवळील वळण, वालूरफाटा, निळे, बहिरेवाडी, केर्ली, वाघबीळ येथील वळणे अपघाताची केंद्रे बनली आहेत. शाहूवाडीतील बहिरेवाडीचा पूल नेमका अरुंद वळणावर व दोन्ही बाजूने दरीच्या भागावर असल्याने येथे अपघात ठरलेले आहेतच. वरचेवर होणाऱ्या अपघातांमुळे पुलाचे गार्ड तुटून त्याची टोके रस्त्याच्या दिशेने वळली आहेत. सुमारे ५० फुटांच्या वक्राकार पुलावरून वाहन जाताना समोरील वाहन थांबवावे लागते. उतारावरून येणाऱ्या वाहनाला पुढचे वाहन क्रॉस होत असेल, तर बाजूपट्टी नसल्याने वाहन थेट पुलाच्या गार्डवरून थेट ५० फूट खोल कडेलोट होणे, हाच पर्याय राहतो. प्रशासनाने या वळणावरील पुलाचे रुंदीकरण करून दरीच्या भागावर सिमेंटचे संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी येथून एक किलोमीटरवरील करंजोशी गावाजवळील पुलावरून एस.टी. कोसळून नऊ प्रवासी ठार, तर वीसजण जखमी झाले होते. त्या पुलापेक्षा हा बहिरेवाडीचा पूल अधिक धोकादायक असताना संबंधित अधिकारी या पुलाची दुरवस्था नजरेआड करीत आहेत. प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पाहते का? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी या १४० किलोमीटर दरम्यान मलकापूर येथील शाळी नदीवरील पूल, भोसलेवाडी व तळवडे येथील पूल, धोपेश्वर फाट्यानजीकचा पूल, वारूळ येथील कडवी नदीवरील पुलांची उभारणी शंभर वर्षांपूर्वीची आहे.बॉक्साईट खनिज, ऊस, कोकणातून येणारे लाकूड या वाहतुकीबरोबर, पवनचक्की, कोकण रेल्वे, जैतापूर प्रकल्प, दाभोळ व फिनोलेक्स प्रकल्पांची अवजड मशिनरी, शिवाय घाटावरून बाजारपेठांना जाणारा माल, भाविक-पर्यटकांचे वाढते प्रमाण पाहता या मार्गावरचे दळणवळण वाढले आहे.सह्याद्रीचा घाटमाथा व अतिवृष्टीच्या टप्प्यातून हा रस्ता जात असल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती देणे गरजेचे आहे. सव्वाशे वर्षे होऊन गेलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे प्रस्ताव निधीअभावी धूळ खात पडले आहेत. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीसाठी निधी मिळवण्यास पाठपुरावा करावा, अशी शाहूवाडी-पन्हाळावासीयांची मागणी आहे.