शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

उंदरवाडीतील साकव धोकादायक

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

बोरवडेतही हीच अवस्था : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांचा साकवावरून धोकदायक प्रवास

रमेश वारके - बोरवडे -कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी येथील गावांच्या कॅनॉलवर असणाऱ्या साकवांची दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या साकवावरील वाहतूक मृत्यूचा सापळा बनली आहे. अनेक अपघात होऊनही पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे.कॅनॉल दुथडी वाहू लागल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच संबंधित खाते जागे होणार का? असा संतप्त सवाल बोरवडे-उंदरवाडी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.बोरवडे येथील पठार नावाच्या साठेमाळवाडी बाजूस असणाऱ्या कॅनॉलवर २२ वर्षांपूर्वी साकव उभा करण्यात आला आहे. निपाणी-राधानगरी रस्त्यावरून पठाराकडे पाणंद गेली आहे. संबंधित साकव हा पाणंदीच्या समोर उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा केला आहे. या साकवावरून शेतकरी व जनावरांची नेहमी वर्दळ असते. अशातच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस तोडणीसाठी या दोन्ही साकवावरून शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस हे दोन्ही साकव अडचणीचे होत आहेत.साकवाच्या दोन्ही बाजूच्या आधारासाठी असणारे संरक्षक कठडे (सळ्या) चोरीला गेले असून, वाहतुकीदरम्यान हा साकव हलतो. तसेच साकवावर वाहतुकीसाठी खाली टाकण्यात आलेला पत्रा गंजून तो कमकुवत झाल्याने सडत चालला आहे. त्यामुळे जनावरांचे पाय अडकून अपघात झाले आहेत.उंदरवाडी येथील साकवाचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या साकवावर अनेक अपघात घडले आहेत. दुचाकींसह-चालक पडणे, फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून जखमा होणे, अशा घटना वारंवार घडल्या आहेत. भीतीपोटी स्त्रिया व लहान मुलांनी साकवावरून प्रवास करणे बंद केले आहे. बोरवडे व उंदरवाडी येथील साकव दुरुस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितपणा यावा यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले होते. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित साकवासंदर्भात आश्वासन दिले होते. संबंधित खात्याने याकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.