शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वाळू वाहतूक बनतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:21 IST

यड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

ठळक मुद्दे रात्रीस खेळ चाले : शासनाकडून कडक अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कारवाईच्या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतोयआर.टी.ओ.शोध लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासकीय यंत्रणा व वाळू वाहतूकदार यांच्या संगनमताने सुरू असलेला कारभार कायद्याच्या कडक अंमलबजावणीस पूरक ठरत नाही.

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रसंगी जीवितास धोका निर्माण होतो. शासनस्तरावरून बेकायदा वाळू वाहतुकीबाबत उपाययोजनांची कडक अंमलबजावणीची घटना टाळू शकेल, अन्यथा घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनल्यास त्याला वाळू वाहतूकदारच जबाबदार राहतील.सध्या बांधकाम क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी लागणाºया वाळूची कमतरता भासत आहे. वाळू उपश्यावरील बंधने व त्याची नियमावली यामुळे सर्वासमक्ष वाळू वाहतूक करणे जोखमीचे व आर्थिक अडचणीचे ठरते. यावर पर्याय म्हणून रात्रीच्यावेळी जादा वाळू भरून, कोणाच्या नजरेस न पडता ट्रॉली निश्चितस्थळी पोहोचविणे हे वाळू वाहतूकदारांचे ध्येय असते.यामुळेच रात्रीचा कालावधी त्यांना सोईस्कर वाटतो. यावेळी वाहने वेग घेतात.बºयाच वाहन चालकांना मद्यपानाचे व्यसन असते. त्यात वेग आणि रात्रीची वेळ अशा परिस्थितीत एखादी घटना घडते आणि आपली वस्तुस्थिती प्रकट होते; परंतु अशा घटनांमध्ये कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला, मोठे आर्थिक संकट उभारले तर याला जबाबदार कोण? बºयाच वेळा दिवसा वाहतुकीवेळी आर.टी.ओ.च्या नजरेत आल्यास इतर राज्यांतील वाहनांचा परमिट, ओव्हरलोडचे कारण, रॉयल्टीच्या अनेक कारणांसाठी मोठ्या रकमेची कायद्याबाहेर तडजोड होते.

अन् वाळू वाहतुकीचा पुढील मार्ग मोकळा होतो. याचा फटका वाळू वाहतूकदारांना होतो.एखादी घटना घडल्यावर महसूल विभाग जागा होतो. पहाटेवेळी तपासणीचे दृश्य फिरावयास जाणाºयांना दिसते; परंतु शासकीय तपासणीस हा वाळू वाहतूकदारांच्या संबंधितच असल्याने यातपासणीत अधिकाºयांच्या नजरेत काहीही येत नाही. शासकीय यंत्रणा व वाळू वाहतूकदार यांच्या संगनमताने सुरू असलेला कारभार कायद्याच्या कडक अंमलबजावणीस पूरक ठरत नाही.

बेकायदा वाळू वाहतुकीने त्यांना आर्थिक नफा होईल; परंतु एखाद्या घटनेत कोणाच्या जीवितास धोका किंवा आर्थिक संकट ओढावल्यास अशा त्रयस्थांनाच याचा फटका बसणार आहे. त्यासाठी शासनाकडून कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनण्यास वाळू व्यापारीच जबाबदार राहतील.दोन वाहने, एकच नंबर महसूल बुडविण्याचा नवा फंडावाहने दोन. रंगसंगती एकसारखी. वाहन क्रमांकही दोन्हीचा एकच. दोन्हीतून वाळू वाहतूक. कमी परवाना जादा वाळू. एकाच वाहनाच्या क्रमांकाची वाळू रॉयल्टी भरून दोन वाहनांतून वाळू वाहतूक शासकीय अधिकाºयांच्या सहकार्याने सुरू करण्याचा फंडा सुरू असल्याची चर्चा शासकीय; परंतु मलिदा न पोहोचलेल्या कर्मचाºयांतून दबक्या आवाजात चालू आहे. शासनाचा महसूल शासकीय कर्मचाºयांकडून बुडविल्याची यंत्रणा यामुळे उघड होत आहे. याचा आर.टी.ओ.शोध लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.