शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बेकायदा वाळू वाहतूक बनतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:21 IST

यड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

ठळक मुद्दे रात्रीस खेळ चाले : शासनाकडून कडक अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, कारवाईच्या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतोयआर.टी.ओ.शोध लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासकीय यंत्रणा व वाळू वाहतूकदार यांच्या संगनमताने सुरू असलेला कारभार कायद्याच्या कडक अंमलबजावणीस पूरक ठरत नाही.

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असते. कोणीतरी पकडेल या भीतीने वाहतुकीचा वेग वाढतो. त्याचबरोबर ओव्हरलोड वाळू असल्याने वेग नियंत्रित न झाल्याने एखादी घटना घडते अन् बेकायदेशीरपणा उघडकीस येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रसंगी जीवितास धोका निर्माण होतो. शासनस्तरावरून बेकायदा वाळू वाहतुकीबाबत उपाययोजनांची कडक अंमलबजावणीची घटना टाळू शकेल, अन्यथा घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनल्यास त्याला वाळू वाहतूकदारच जबाबदार राहतील.सध्या बांधकाम क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी लागणाºया वाळूची कमतरता भासत आहे. वाळू उपश्यावरील बंधने व त्याची नियमावली यामुळे सर्वासमक्ष वाळू वाहतूक करणे जोखमीचे व आर्थिक अडचणीचे ठरते. यावर पर्याय म्हणून रात्रीच्यावेळी जादा वाळू भरून, कोणाच्या नजरेस न पडता ट्रॉली निश्चितस्थळी पोहोचविणे हे वाळू वाहतूकदारांचे ध्येय असते.यामुळेच रात्रीचा कालावधी त्यांना सोईस्कर वाटतो. यावेळी वाहने वेग घेतात.बºयाच वाहन चालकांना मद्यपानाचे व्यसन असते. त्यात वेग आणि रात्रीची वेळ अशा परिस्थितीत एखादी घटना घडते आणि आपली वस्तुस्थिती प्रकट होते; परंतु अशा घटनांमध्ये कोणाच्या जीवितास धोका निर्माण झाला, मोठे आर्थिक संकट उभारले तर याला जबाबदार कोण? बºयाच वेळा दिवसा वाहतुकीवेळी आर.टी.ओ.च्या नजरेत आल्यास इतर राज्यांतील वाहनांचा परमिट, ओव्हरलोडचे कारण, रॉयल्टीच्या अनेक कारणांसाठी मोठ्या रकमेची कायद्याबाहेर तडजोड होते.

अन् वाळू वाहतुकीचा पुढील मार्ग मोकळा होतो. याचा फटका वाळू वाहतूकदारांना होतो.एखादी घटना घडल्यावर महसूल विभाग जागा होतो. पहाटेवेळी तपासणीचे दृश्य फिरावयास जाणाºयांना दिसते; परंतु शासकीय तपासणीस हा वाळू वाहतूकदारांच्या संबंधितच असल्याने यातपासणीत अधिकाºयांच्या नजरेत काहीही येत नाही. शासकीय यंत्रणा व वाळू वाहतूकदार यांच्या संगनमताने सुरू असलेला कारभार कायद्याच्या कडक अंमलबजावणीस पूरक ठरत नाही.

बेकायदा वाळू वाहतुकीने त्यांना आर्थिक नफा होईल; परंतु एखाद्या घटनेत कोणाच्या जीवितास धोका किंवा आर्थिक संकट ओढावल्यास अशा त्रयस्थांनाच याचा फटका बसणार आहे. त्यासाठी शासनाकडून कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधित घटनास्थळावरील ग्रामस्थ आक्रमक बनण्यास वाळू व्यापारीच जबाबदार राहतील.दोन वाहने, एकच नंबर महसूल बुडविण्याचा नवा फंडावाहने दोन. रंगसंगती एकसारखी. वाहन क्रमांकही दोन्हीचा एकच. दोन्हीतून वाळू वाहतूक. कमी परवाना जादा वाळू. एकाच वाहनाच्या क्रमांकाची वाळू रॉयल्टी भरून दोन वाहनांतून वाळू वाहतूक शासकीय अधिकाºयांच्या सहकार्याने सुरू करण्याचा फंडा सुरू असल्याची चर्चा शासकीय; परंतु मलिदा न पोहोचलेल्या कर्मचाºयांतून दबक्या आवाजात चालू आहे. शासनाचा महसूल शासकीय कर्मचाºयांकडून बुडविल्याची यंत्रणा यामुळे उघड होत आहे. याचा आर.टी.ओ.शोध लावणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.