शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

आंबेडकरांमुळे दीनदलित मुख्य प्रवाहात

By admin | Updated: February 11, 2016 00:47 IST

एन. डी. पाटील : हुपरी येथे शेंडुरे महाविद्यालयात दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र

हुपरी : दीनदलित, उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य करण्याबरोबरच त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याची किमया विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालय, आंबेडकर अकॅडमी सातारा व समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती व विचार’ या विषयावरील दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते.ते म्हणाले, अगदी शालेय जीवनापासूनच आंबेडकर यांना अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीस सामोरे जावे लागले होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. धर्मांध व कर्मकांडीत सनातनी समाजाबरोबर दोन हात करीत-करीत त्यांनी स्वत:ची एक वेगळी जडण-घडण केली. ज्यांच्या हाती धर्मसत्ता व राज्यसत्ता होती अशांच्या विरोधात प्रखर लढा उभारून दीनदलित, शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद मोडून काढण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.ते म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनीही विविध धर्मातील कर्मकांड करणाऱ्या पाखंडी वृत्तीच्या धर्मगुरुंना उघडे पाडण्याचे काम केले आहे. कर्मकांडाबाबत समाजप्रबोधन करून स्वकथित बुद्धिवाद्यांचा थोतांडपणा समाजासमोर आणून त्यांनी प्रत्येक माणसाची किंमत व त्यांचे अस्तित्व संपूर्ण मानवजातीला जाणवून दिले आहे. महिलांमध्ये शैक्षणिक चळवळ जोपर्यंत वाढीस लागत नाही, तोपर्यंत समाज शहाणा होणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी सन १८४८ साली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्याला धर्मपंडितांनी फार मोठा विरोध केला. चर्चासत्रामध्ये साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना’, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांची समकालीन प्रस्तुतता : चर्चा व प्रश्नोत्तरे’, झाली. तसेच प्रसाद कुलकर्णी यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मविषयक भूमिका’, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘जाती निर्मूलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार’, किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान होणार आहेत. (वार्ताहर)