शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांमुळे दीनदलित मुख्य प्रवाहात

By admin | Updated: February 11, 2016 00:47 IST

एन. डी. पाटील : हुपरी येथे शेंडुरे महाविद्यालयात दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र

हुपरी : दीनदलित, उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य करण्याबरोबरच त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून देण्याची किमया विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालय, आंबेडकर अकॅडमी सातारा व समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती व विचार’ या विषयावरील दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते.ते म्हणाले, अगदी शालेय जीवनापासूनच आंबेडकर यांना अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीस सामोरे जावे लागले होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. धर्मांध व कर्मकांडीत सनातनी समाजाबरोबर दोन हात करीत-करीत त्यांनी स्वत:ची एक वेगळी जडण-घडण केली. ज्यांच्या हाती धर्मसत्ता व राज्यसत्ता होती अशांच्या विरोधात प्रखर लढा उभारून दीनदलित, शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद मोडून काढण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.ते म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनीही विविध धर्मातील कर्मकांड करणाऱ्या पाखंडी वृत्तीच्या धर्मगुरुंना उघडे पाडण्याचे काम केले आहे. कर्मकांडाबाबत समाजप्रबोधन करून स्वकथित बुद्धिवाद्यांचा थोतांडपणा समाजासमोर आणून त्यांनी प्रत्येक माणसाची किंमत व त्यांचे अस्तित्व संपूर्ण मानवजातीला जाणवून दिले आहे. महिलांमध्ये शैक्षणिक चळवळ जोपर्यंत वाढीस लागत नाही, तोपर्यंत समाज शहाणा होणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी सन १८४८ साली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्याला धर्मपंडितांनी फार मोठा विरोध केला. चर्चासत्रामध्ये साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना’, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांची समकालीन प्रस्तुतता : चर्चा व प्रश्नोत्तरे’, झाली. तसेच प्रसाद कुलकर्णी यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मविषयक भूमिका’, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘जाती निर्मूलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार’, किशोर बेडकिहाळ यांचे व्याख्यान होणार आहेत. (वार्ताहर)