शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST

मलकापूर : आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे ...

मलकापूर : आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथील शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू असलेल्या धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सहा गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी रानावनात फिरणाऱ्या महिलांना आपल्या हक्काचे पाणी मिळणार आहे. शेतीला बंदिस्त कालव्यातून मीटरद्वारे पाणी दिले जाणार आहे.

आंबर्डे गावच्या हद्दीत शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने लघू पाटबंधारे तलाव मंजूर झाला आहे. या तलावामुळे १४५ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे; तर सहा गावांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी मिळणार आहे. २०१८ साली धरणाचे काम सुरू झाले आहे. काम बंद नसल्यामुळे अंतिम टप्प्याकडे कामाची वाटचाल सुरू आहे. धरणात १६५८ स. घ. मी. एवढा पाणीसाठा होणार आहे. आमदार विनय कोरे, माजी बांधकाम सभापती, जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धरणाच्या भरावाचे व पिचिंगचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना मोबदला म्हणून दोन कोटी ३४ लाख रुपयांचे वाटप केले गेले आहे. बंदिस्त कालव्याचे काम पुढील हंगामात केले जाणार आहे. शेतीला बंदिस्त कालव्यातून पाणी दिले जाणारे आहे. कार्यकारी अभियंता धनाजी पाटील, शाखा अभियंता विपुल खोत, ठेकेदार आनंदराव पाटील यांनी समन्वयातून काम प्रगतिपथावर नेले आहे.

फोटो

आंबर्डे (ता. शाहूवाडी) येथे धरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना.