शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा, धामणी धरण ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास करण्याचा धरणग्रस्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यांतील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविणाऱ्या राई ...

गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यांतील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविणाऱ्या राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास १६ नोव्हेंबर २००० रोजी सुरुवात केली. निधीअभावी प्रकल्प अर्ध्यावरच रखडला आहे. या-ना-त्या कारणाने धरणग्रस्तांनाही वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.२१ वर्षे मागे पडली तरी येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. दोन वर्षांपासून गट नं.९९ मध्ये वसाहत क्र.१ तसेच गट नं.८३ मध्ये वसाहत क्र.२ मध्ये नवीन वसाहती विस्थापनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, येथे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या पायाभूत सुविधांची वानवा आहे. याबाबत प्रशासनास वारंवार लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यांना साकडे घातले, पण आजअखेर आश्वासनापलीकडे काहीही पदरात पडले नाही. २१ वर्षांपासून येथील जनतेला रानटी जीवन जगावे लागते. आमच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा २१ डिसेंबर रोजी आमच्या राई गावापासून थेट जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही धरणग्रस्त पायी चालण्याचा आंदोलनाचा वेगळा मार्ग अवलंबणार आहे. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत जिनगरे, उपाध्यक्ष देऊ पाटील, कृष्णा जिनगरे, संजय शिंदे, धोंडीबा गुरव, युवराज गुरव अशा दहा पदाधिकारी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. यासंबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकारी राधानगरी, कार्यकारी अभियंता कोल्हापूर, आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार राधानगरी, पोलीस निरीक्षक राधानगरी यांना दिले आहे.