शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

मराठी साहित्य संमेलनावर दलित महासंघ मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:24 IST

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा ठराव करावा म्हणून नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी ...

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असा ठराव करावा म्हणून नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ मार्च रोजी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकटे म्हणाले, दलित महासंघ गेले २९ वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संघटना असून जहाल आणि आक्रमक आंदोलन केले आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबरोबरच अण्णाभाऊ साठे हे या संघटनेचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या विचाराने ही संघटना कार्य करीत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे सांगली येथील वाटेगाव या जन्मगावी आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, या मागणीचा ठराव होण्यासाठी यापूर्वीही आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढला आहे. अण्णाभाऊ साठे यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष झाले असून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबतचा ठराव करण्याची मागणीसाठी राज्यातून साठे प्रेमी मोठ्या संख्येने नाशिकमध्ये जाणार आहेत. पत्रकार परिषदेेला अमोल महापुरे, बाबासाहेब दबडे, पुष्पलता सकटे, जगन्नाथ घोंगडे, आप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ आदी उपस्थित होते.