शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

वडिलांच्या मायेने गतिमंद मुलास आणले खेचून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:50 IST

तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. वडिलांच्या तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला. अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो आज, मंगळवारी मूळ गावी साजणीला परत येत आहे.

ठळक मुद्देवडिलांच्या मायेने गतिमंद मुलास आणले खेचूनसतरा दिवसांची उलघाल : तिरूपती रेल्वेमधून होता हरवला

कोल्हापूर : तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. वडिलांच्या तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला. अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो आज, मंगळवारी मूळ गावी साजणीला परत येत आहे.घडले ते असे, अमरनाथ हा गतिमंद आहे. प्रत्येकवर्षी दिवाळीनंतर तो वडिलांसोबत बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला जात असे. यंदाही तो ९ जानेवारीस रेल्वेच्या स्लिपर कोचमधून निघाला असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास तो लघुशंकेसाठी गेला असता, कुणाला एका प्रवाशाला अनावधानाने धक्का लागला. त्यातून वाद झाल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला हाताला धरून जनरल डब्यात नेऊन बसविले.

थोड्या वेळाने वडिलांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले, तर मुलगा जाग्यावर नव्हता; त्यामुळे त्यांनी सारे डबे शोधले; परंतु मुलगा सापडला नाही. तिरूपती रेल्वेस्थानकावरून तो बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते; त्यामुळे मुलगा तिरूपतीमध्येच आहे, असा विश्वास वडिलांना होता. त्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसांत देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी दाद दिली नाही.

कुणाला काही विचारायचे म्हटले, तरी भाषेची अडचण होती; परंतु तरीही वडिलांनी धीर सोडला नाही. स्वत:च त्याच्याविषयीचे पोस्टर तयार करून रिक्षातून जाऊन सगळीकडे चिकटवली. हॉटेल्स, गॅरेजेस, सरकारी दवाखाना, सार्वजनिक उद्यानात त्यांनी त्याचा शोध घेतला.

कुणीतरी संपर्क साधला, तर लगेच मुलाकडे जाता यावे; यासाठी त्यांनी तिरूपतीमध्येच ठाण मांडले. शनिवारी (दि. २५) त्यांच्या या धडपडीला यश आले. त्यांचा मुलगा मूळच्या बुलढाण्याच्या असलेल्या कपीलतीर्थम परिसरातील ‘संत सावता माळी भोजनालया’त काहीतरी खायला मिळेल म्हणून गेला.

हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. मुळ डोंगरखंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला.

वडील तिथेच रेल्वेस्टेशनवर होते. त्यांनी पळत जाऊन मुलाला मिठी मारली. त्याला पाहून त्यांच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मुलगा सापडल्यानंतर हे दोघेही बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. 

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंkolhapurकोल्हापूर