शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

सहकार शुद्धिकरणाची ‘दादा’गिरी थंडावणार

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

चंद्रकांतदादांना बढती : सहकारसम्राटांनी सोडला नि:श्वास; चौकशीच्या फेऱ्यातून सुटका?

राजाराम लोंढे / कोल्हापूर चंद्रकांतदादा पाटील यांना महसूलमंत्रिपदी बढती मिळाल्याने सहकारातील दिग्गजांनी काहीसा नि:श्वास सोडला आहे. पावणेदोन वर्षे मंत्री पाटील यांनी सहकारातील स्वाहाकाराला लगाम लावत चौकशीचा ससेमिरा मागे लावल्याने संस्थाचालक मेटाकुटीला आले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे स्वत: सहकार नेते असल्याने दादांच्या ताकदीने काम करण्यावर त्यांच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा कोणत्या क्षेत्राचा अभ्यास अधिक आहे, त्याची आवक पाहूनच खाते वाटप केले जाते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील या दिग्गजांचीच सहकारमंत्री म्हणून वर्णी लागली. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर संस्थाचालकच राज्याचा सहकारमंत्री असेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. दादांनी गेली पावणेदोन वर्षे सहकार शुद्धिकरणाची मोहीम हाती घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण राज्यातील संस्थांचे सर्वेक्षण करून बोगस संस्था बंद करण्याचे आदेश दिले. केवळ मतांसाठी काढलेल्या संस्था अवसायनात काढून सहकारसम्राटांना दादांनी पहिला हादरा दिला. ज्या बँकांच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅँकेने कारवाई केली, त्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा वटहुकूम काढला. यामुळे दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. राज्य बँकेच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, लक्ष्मण पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची पदे धोक्यात आली आहेत. वटहुकुमाला विधानपरिषदेत मान्यता मिळाली नसल्याने दादांनी नव्याने वटहुकूम काढला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरी कारवाईची तलवार सहकारसम्राटांच्या डोक्यावर कायम आहे. ‘एफआरपी’चा प्रश्नही चाणाक्षपणे हाताळून कारखानदारांना ‘एफआरपी’ देणे भाग पाडले. ज्यांनी दिली नाही त्यांच्यावर थेट परवाना रद्दची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने साखर उद्योग हादरून गेला. अनेक सहकारी संस्थांची चौकशी लावून दादांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. दादांना थोपविण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते निष्पभ्र ठरले. आतापर्यंत एवढ्या ताकदीने सहकार खात्यात दादांनीच काम केल्याचे सहकारातील तज्ज्ञ खासगीत बोलत आहेत. नवीन सहकारमंत्री सोलापूरचे सुभाष देशमुख यांची ‘लोकमंगल’ संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. सहकारातील नेत्यांवरच ही जबाबदारी दिल्याने दादांनी राबविलेली शुद्धिकरणाची मोहीम त्या ताकदीने पुढे जाईल, असे जाणकारांना वाटत नाही. प्रभावी कामाचे बक्षीस ! देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पावणेदोन वर्षांचा लेखाजोखा मांडताना सर्वांत प्रभावी असे काम सहकार खात्यात झाल्याचे नमूद करावे लागेल. दादा पक्षाध्यक्ष ‘अमित शहा यांचे निकटवर्ती’ म्हणून महसूल खाते मिळाल्याची कितीही चर्चा सुरू असली तरी दादांनी सहकार विभागात केलेल्या आक्रमक कामांची दखल घेऊनच मुख्यमंत्र्यांनी दादांना बढती दिल्याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे.