शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

‘बाबां’च्या खांद्यावरून ‘दादां’चा निशाणा

By admin | Updated: April 26, 2016 00:44 IST

संजय घाटगे गटाला उभारी : हसन मुश्रीफ यांना रोखण्यासाठी घाटगेंना बळ देण्याची व्यूहरचना

दत्ता पाटील -- म्हाकवे कागल तालुक्यात तीन सहकारी आणि एक खासगी साखर कारखाना कार्यरत असतानाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना साखर कारखान्यासाठी परवाना देण्याचे सूतोवाच केले आहे. यामागे आमदार हसन मुश्रीफ यांना त्यांच्याच तालुक्यात रोखून त्यांना शह देण्याचाच उद्देश असल्याचे बोलले जात आहे. परंतु, काहीही असले तरी यामुळे तब्बल १७ वर्षे सत्तेबाहेर असतानाही गटाचे अस्तित्व अबाधित राखणाऱ्या माजी आमदार संजय घाटगे गटाला उभारी मिळाली आहे.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कारभारावरून सध्या चंद्रकांत पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांचा जिल्हा बँकेसह महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ यासह गडहिंग्लज, आजरा, बिद्री कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे त्यांची ही घोडदौड रोखण्यासाठी त्यांना कागल मतदारसंघातूनच सुरुवात करणे गरजेचे आहे. संजय घाटगे हे सध्या शिवसेनेत आहेत. तरीही ते कोणत्या पक्षात आहेत? त्यांचे कोणाशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत? याचा विचार न करता चंद्रकांतदादांनी केवळ मुश्रीफ यांना रोखण्यासाठी संजय घाटगे यांना बळ देण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखल्याचेही बोलले जात आहे.अन्नपूर्णा पाणी योजनेच्या माध्यमातून पिकविलेला लाखभर टन ऊस गाळप करण्यासाठी संजय घाटगे यांना कारखाना काढून देण्याची घोषणा करताना पाटील म्हणाले की, प्रसंगी सहकार कायद्यात तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु, संजय घाटगे यांना कारखाना देणारच. यामुळे अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर असणाऱ्या संजय घाटगे गटात नवचैतन्य पसरले आहे. दरम्यान, आगामी विधानसभेचे उमेदवार असणाऱ्या संजय घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य मेळाव्याचे आयोजन केले; तर आमदार हसन मुश्रीफ यांनीही तालुक्याच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक फार मोठ्या चुरशीने होणार, हे निश्चित. सहकारामुळेच अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजना होऊ शकली. व्हनाळी, सावर्डे परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस वेळेत तुटला जावा, तसेच या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी कारखान्याची गरज आहे. आम्हाला सत्ता, संपत्तीपेक्षा जनता हीच सर्वस्व वाटते. त्यामुळे त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य समजतो.- संजय घाटगे, माजी आमदारत्याचप्रमाणे साके, व्हनाळी, गोरंबे, केनवडे, सावर्डे, सावतवाडी, पिराचीवाडी या डोंगरमाथ्यावर पाण्याची सोय करून हक्काचा ऊस निर्माण करून आता साखर कारखाना निर्माण करण्याचे प्रयत्न घाटगे यांनी सुरू केले आहेत.