शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दादा, रागावू नका हो..!

By admin | Updated: June 2, 2015 01:21 IST

हसन मुश्रीफ यांचा टोला : शालूतून टीका करणारे निवेदन

कोल्हापूर : चंद्रकांतदादा तुम्ही रागावू नका..आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढला म्हणून आम्हाला शिक्षा करा, परंतु अनेक संकटांनी त्रस्त झालेल्या ऊस उत्पादकांच्या पोटावर मारू नका, इतके हळवे होऊ नका, असा उपरोधिक सल्ला देत आमदार हसन मुश्रीफ यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोला लगावला आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हेतुपुरस्सर माझ्या घरावर मोर्चा काढत असल्याचा आरोप केला होता. त्यास मुश्रीफ यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’एवढी रक्कम राज्यात मिळालेली नाही. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ‘एफआरपी’ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेवटच्या अंदाजे दोन महिन्यांमध्ये गाळपास आलेल्या उसाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. साखरेचे दर २१०० रुपये क्ंिवटलपेक्षा कमी झाल्यामुळे हे संकट उभे राहिले. विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण सहकारमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ देण्यासाठी २००० कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची फक्त घोषणा केली. अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपली शासकीय विश्रामधामवर १५ मे रोजी भेट घेतली. त्यावेळी आपण १९ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही निर्णय घेऊ. उशिरात उशिरा ३१ मेपूर्वी पैसे देऊ, असे सांगितले. त्यावेळी आम्ही, जर ३१ मेपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर तुमच्या निवासस्थानावर ६ जूनला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यावर, मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. जर मोर्चाने आला तर चहा देऊ, असे म्हणालात. मी मुंबईत मंत्रालयात २७ मे रोजी आपणास भेटून ६ जूनच्या मोर्चाची आठवण करून दिली. त्यावेळी आपण जरूर या. माझे उत्तर ठरलेले आहे, असे म्हणालात. दादा, उसाची व इतर आंदोलने सध्या स्थानिक मंत्र्यांच्या घरासमोर करण्याची प्रथा पाडलेली आहे. उदा. बारामतीला शरद पवार यांच्या घरासमोर, कऱ्हाड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर, इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर, अंगणवाडीच्या व आशा वर्कर भगिनींचा मोर्चा, टोलविरोधी कृती समितीचा मोर्चा तर माझ्या निवासस्थानासमोर आल्यावर मी त्यांचे मंडप घालून स्वागत केले. इतकेच नव्हे तर उसाच्या प्रश्नावर सोलापूरच्या प्रभाकर देशमुख यांनीही आपल्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. यापूर्वी जर आपण असे आवाहन केले असते, तर आम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला असता. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मोर्चाचे नियोजन झाले आहे. यामध्ये जर बदल केला तर आम्ही घाबरलो, असा लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आमचा नाईलाज आहे.