शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

दादा, रागावू नका हो..!

By admin | Updated: June 2, 2015 01:21 IST

हसन मुश्रीफ यांचा टोला : शालूतून टीका करणारे निवेदन

कोल्हापूर : चंद्रकांतदादा तुम्ही रागावू नका..आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढला म्हणून आम्हाला शिक्षा करा, परंतु अनेक संकटांनी त्रस्त झालेल्या ऊस उत्पादकांच्या पोटावर मारू नका, इतके हळवे होऊ नका, असा उपरोधिक सल्ला देत आमदार हसन मुश्रीफ यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टोला लगावला आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हेतुपुरस्सर माझ्या घरावर मोर्चा काढत असल्याचा आरोप केला होता. त्यास मुश्रीफ यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’एवढी रक्कम राज्यात मिळालेली नाही. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ‘एफआरपी’ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेवटच्या अंदाजे दोन महिन्यांमध्ये गाळपास आलेल्या उसाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. साखरेचे दर २१०० रुपये क्ंिवटलपेक्षा कमी झाल्यामुळे हे संकट उभे राहिले. विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण सहकारमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ देण्यासाठी २००० कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची फक्त घोषणा केली. अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपली शासकीय विश्रामधामवर १५ मे रोजी भेट घेतली. त्यावेळी आपण १९ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणत्याही परिस्थितीत आम्ही निर्णय घेऊ. उशिरात उशिरा ३१ मेपूर्वी पैसे देऊ, असे सांगितले. त्यावेळी आम्ही, जर ३१ मेपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर तुमच्या निवासस्थानावर ६ जूनला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यावर, मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही. जर मोर्चाने आला तर चहा देऊ, असे म्हणालात. मी मुंबईत मंत्रालयात २७ मे रोजी आपणास भेटून ६ जूनच्या मोर्चाची आठवण करून दिली. त्यावेळी आपण जरूर या. माझे उत्तर ठरलेले आहे, असे म्हणालात. दादा, उसाची व इतर आंदोलने सध्या स्थानिक मंत्र्यांच्या घरासमोर करण्याची प्रथा पाडलेली आहे. उदा. बारामतीला शरद पवार यांच्या घरासमोर, कऱ्हाड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर, इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर, अंगणवाडीच्या व आशा वर्कर भगिनींचा मोर्चा, टोलविरोधी कृती समितीचा मोर्चा तर माझ्या निवासस्थानासमोर आल्यावर मी त्यांचे मंडप घालून स्वागत केले. इतकेच नव्हे तर उसाच्या प्रश्नावर सोलापूरच्या प्रभाकर देशमुख यांनीही आपल्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. यापूर्वी जर आपण असे आवाहन केले असते, तर आम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला असता. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मोर्चाचे नियोजन झाले आहे. यामध्ये जर बदल केला तर आम्ही घाबरलो, असा लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आमचा नाईलाज आहे.