शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाणी योजनांच्या निधीवर ‘दरोडा’

By admin | Updated: June 29, 2015 00:42 IST

मलिद्याचा नियोजनबद्ध आस्वाद : टक्केवारीशिवाय ढपला; टंचाई कायम

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -पुढील २० वर्षांतील पाण्याची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून राबविलेल्या अनेक पाणी योजनांतील निधीवर गावपातळीपासून जिल्हा पातळीवरील यंत्रणा, पदाधिकाऱ्यांनी (अपवाद वगळून) अक्षरश: दरोडा टाकला आहे. अतिशय नियोजनबद्धपणे मलिद्याचा आस्वाद घेतला जात आहे. नियमित टक्केवारीशिवाय ढपला मारण्याच्या प्रवृत्तीमुळे योजना राबवूनही गावे तहानलेलीच असतात. जिल्ह्यात एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. तीन हजार १२५ वाड्या-वस्त्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाड्या-वस्त्यांतील प्रत्येक ग्रामस्थाला शुद्ध, मुबलक पाणी मिळावे, यासाठी शंभर टक्के अनुदानावर पाणी योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी पन्नास टक्के याप्रमाणे निधी दिला जात आहे. पुढील २० वर्षांतील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकसंख्येच्या आधारे कमीत कमी १० लाख ते १० कोटींंपर्यंतची एक योजना राबविली जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यात सत्तेवर होते, त्यावेळेपासून अनेक गावांतील पाणी योजनेची चौकशी दाबून ठेवली गेली. तक्रारदारांचे हेलपाटे मारून चप्पल तुटले. घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजणार? अशी मानसिकता करून घेऊन तक्रारदार शांत झाले. ढपला मारलेले सुटले. मात्र, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी बदलले. पारदर्शक कारभाराकडे कटाक्षाने लक्ष देणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार आलेल्या तक्रारींची दखल घेऊ लागले. गेल्या पाच वर्षांपासून अपहार करूनही मोकाट असलेल्या पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील दोषींवर फौजदारी दाखल झाली. त्यानंतर जांभूळवाडी पेयजल योजनेत संगनमताने २८ लाखांचा अपहार करून ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून पुन्हा भरलेल्या सरपंचासह १४ जणांवर गुरुवारी (दि. १८) फौजदारी दाखल झाली. अजूनही कारवाईच्या रांगेत काही गावे आहेत. काही गावांतील योजनांची चौकशी तालुका पातळीवर दाबून ठेवली आहे. (क्रमश:)जिल्ह्यातील बहुसंख्य पाणी योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ज्या योजनेसंबंधी तक्रार झाली, पाठपुरावा करण्यात आला, त्याचीच चौकशी होत आहे. सर्वच पाणी योजनेची चौकशी केल्यास आणखी गैरव्यवहार चव्हाट्यावर येतील. केवळ फौजदारी करणे म्हणजे वेळकाढूपणा आहे. निर्र्धारित वेळेत गैरव्यवहाराची रक्कम वसूल करून शिक्षा देण्याची व्यवस्था निर्माण करण्याची गरज ठळक झाली आहे. - उत्तम नंदूरकर, सातवे, ता. पन्हाळा२४२ गावांत योजना पूर्ण...सन २०१२ ते २०१३ अखेर ‘पेयजल’मधून पाणी योजना पूर्ण झालेल्या गावांची संख्या तालुकानिहाय अशी : आजरा- ७, भुदरगड- २२, चंदगड- ३०, गडहिंग्लज- २३, गगनबावडा- १३, हातकणंगले- १२, कागल- १८, करवीर- ३२, पन्हाळा- १६, राधानगरी- २८, शाहूवाडी - २३, शिरोळ- ८.आकडे बोलतात...पाच वर्षांत योजनेत पूर्ण झालेल्या गावांची संख्या व कंसात वर्षनिहाय खर्च अनुदान असे -सन २००९-१० : २७५ (३० कोटी ८३ लाख).सन २०१०-११ : ३५३ (४३ कोटी ४३ लाख ९ हजार).सन २०११-१२ : २२० (६५ कोटी ६४ लाख ७५ हजार).सन २०१२- १३ :२४ (७५ कोटी १७ लाख ७५ हजार).सन २०१३-१४ : २२६ (११ कोटी ६३ लाख ४९ हजार).सन २००९ ते २०१४ अखेर जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १६८३ नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या. यावर शासनाचे एकूण २२५ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाले. दरम्यान, नवीन शासन आल्यानंतर आणि गेल्या सत्ताधाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला. जांभूळवाडी योजनेतील ‘ढपलागिरी’ उघड होऊन सरपंच, ठेकेदारासह १४ जणांवर फौजदारी दाखल झाली. जिल्ह्यातील पाणी योजनांत किती ‘गोलमाल’ आहे याची चर्चा होत आहे. सातवे (ता. पन्हाळा) येथे पाणी योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी सरपंचासह तिघे अटक झाले. त्यामुळे योजनेचा खर्च, उद्देश, ढपला संस्कृती यांचा लेखाजोखा मांडणारी मालिका...