शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

दाभोलकरांच्या हौतात्म्याचीही उपेक्षाच

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

‘अंनिस’ आक्रमक : मूग गिळून बसलेल्या लोकप्रतिनिधींवर हमीद यांचा हल्लाबोल

सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विधिमंडळाची दोन अधिवेशने झाली; पण याविषयी प्रश्न विचारावा असे एकाही लोकप्रतिनिधीला वाटले नाही. लोकसभेतही ‘आप’च्या पंजाबमधील खासदाराने प्रश्न उपस्थित केला; पण महाराष्ट्रातील ४८ खासदार मूग गिळून बसले. या निद्रिस्त लोकप्रतिनिधींना आणि मुर्दाड यंत्रणेला समाजानेच आता जागे करावे,’ असा घणाघात डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी केला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला शनिवारी (नऊ आॅगस्ट) पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. वीस आॅगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता आणि परिणामकारकता वाढविण्याचा निर्णय ‘अंनिस’ने घेतला असून, त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाह प्रशांत पोतदार, कुमार मंडपे उपस्थित होते. गेल्या अडीच महिन्यांपासून केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सुरू आहे; मात्र त्यातही समाधानकारक प्रगती नसल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करून डॉ. हमीद म्हणाले, ‘सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘अंनिस’बद्दल काहीच माहिती नाही. डॉ. दाभोलकर यांच्या विचारांना विरोध करणारे कोण-कोण होते, याची माहिती घेण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली. तत्पूर्वी पोलीस तपासात प्रगतीऐवजी ‘प्लँचेट’सारखे वादग्रस्त मुद्देच अधिक चर्चेत आले. त्याविषयीचे सत्यही समाजापर्यंत पोहोचविण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. विचार मान्य असोत की नसोत, एका सामाजिक कार्यकर्त्याचा खून होणे आणि लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य नसणे ही बाब चिंता वाटायला लावणारी आहे. डॉ. दाभोलकर फक्त ‘अंनिस’चे नव्हते. समाजासाठी त्यांनी बलिदान केले. त्यामुळे समाजानेच आता शासनकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.’ (प्रतिनिधी)