शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरे प्रामाणिक अभिव्यक्तीचे बळी

By admin | Updated: June 20, 2016 00:51 IST

जे. एफ. पाटील यांचे मत : अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार; ‘रवळनाथ’चा चौथा वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी प्रामाणिकपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केल्याने बळी गेले, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. परिस्थिती गंभीर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. आजरा येथील श्री रवळनाथ को-आॅपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कोल्हापूर शाखेच्या चौथ्या वर्धापनदिनप्रसंगी अमृतमहोत्सवानिमित्त पाटील व त्यांच्या पत्नी कमल यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. बा. प. साबळे अध्यक्षस्थानी होते. लकी बझारच्या इंद्रप्रस्थ हॉलमध्ये कार्यक्रम झाला. संस्थापक अध्यक्ष म. ल. पाटील, डॉ. आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, मोकळेपणाने आपली मते मांडणेही अवघड बनल्याने सध्याचे वातावरण भयावह बनले आहे; म्हणूनच समाजाची फेररचना करण्याची गरज ठळक आहे. अलीकडे विषमतेची दरी वाढवणारी व्यवस्था मजबूत होते आहे. सामान्यांच्या हितासाठी भाववाढीवर लक्ष केंद्रित केल्यानेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्त होण्यास इच्छुक नाही, अशी अवस्था राष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची सध्याच्या सरकारने केली. सामान्यांच्या खिशातील पैसे काढून घेत, व्याजदर कमी करीत भांडवलदारांचे हित जपले जात आहे. त्याला राजन विरोध करीत राहिले. परिणामी सप्टेंबरमध्ये त्यांना सरकार बाजूला करणार होते. त्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी पुन्हा गव्हर्नरपद नको, असे म्हटले आहे. ‘आरबीआय’चे धोरण ठरवण्याचा अधिकार तज्ज्ञांकडेच असावा. राजकीय हस्तक्षेप प्रमाणापेक्षा अधिक असू नये. डॉ. साबळे म्हणाले, येत्या महिन्याभरात देशात प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे नवे शैक्षणिक धोरण ठरविण्यात येईल. राज्यातील विद्यापीठ कायद्यातही दुरुस्ती होणार आहे. त्यावर डॉ. पाटील यांनी लिहीत राहावे. यावेळी संपादक श्रीराम पवार, एस. ई. कालेकर, प्रा. आनंद पाटील यांची भाषणे झाली. प्रा. आर. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास व्ही. बी. पाटील, डॉ. वासंती रासम, कुलसचिव व्ही. एम. शिंदे, विश्वनाथ शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. डॉ. वर्षा मेंदगी यांनी आभार मानले. ‘ते’ कुलगुरू झाले नाहीत पात्र असूनही डॉ. जे. एफ. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले नाहीत. ते कुलगुरू झाले असते तर प्रशासकीय कामकाजात अडकले असते. त्यांचा मानवी चेहरा हरवला असता. यामुळे नियतीला ते कुलगुरू व्हावेत असे वाटले नसावे, अशी टिप्पणी डॉ. साबळे यांनी केली.