शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दाभोलकर, पानसरे प्रामाणिक अभिव्यक्तीचे बळी

By admin | Updated: June 20, 2016 00:51 IST

जे. एफ. पाटील यांचे मत : अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार; ‘रवळनाथ’चा चौथा वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी प्रामाणिकपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केल्याने बळी गेले, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. परिस्थिती गंभीर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. आजरा येथील श्री रवळनाथ को-आॅपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कोल्हापूर शाखेच्या चौथ्या वर्धापनदिनप्रसंगी अमृतमहोत्सवानिमित्त पाटील व त्यांच्या पत्नी कमल यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. बा. प. साबळे अध्यक्षस्थानी होते. लकी बझारच्या इंद्रप्रस्थ हॉलमध्ये कार्यक्रम झाला. संस्थापक अध्यक्ष म. ल. पाटील, डॉ. आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, मोकळेपणाने आपली मते मांडणेही अवघड बनल्याने सध्याचे वातावरण भयावह बनले आहे; म्हणूनच समाजाची फेररचना करण्याची गरज ठळक आहे. अलीकडे विषमतेची दरी वाढवणारी व्यवस्था मजबूत होते आहे. सामान्यांच्या हितासाठी भाववाढीवर लक्ष केंद्रित केल्यानेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्त होण्यास इच्छुक नाही, अशी अवस्था राष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची सध्याच्या सरकारने केली. सामान्यांच्या खिशातील पैसे काढून घेत, व्याजदर कमी करीत भांडवलदारांचे हित जपले जात आहे. त्याला राजन विरोध करीत राहिले. परिणामी सप्टेंबरमध्ये त्यांना सरकार बाजूला करणार होते. त्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी पुन्हा गव्हर्नरपद नको, असे म्हटले आहे. ‘आरबीआय’चे धोरण ठरवण्याचा अधिकार तज्ज्ञांकडेच असावा. राजकीय हस्तक्षेप प्रमाणापेक्षा अधिक असू नये. डॉ. साबळे म्हणाले, येत्या महिन्याभरात देशात प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे नवे शैक्षणिक धोरण ठरविण्यात येईल. राज्यातील विद्यापीठ कायद्यातही दुरुस्ती होणार आहे. त्यावर डॉ. पाटील यांनी लिहीत राहावे. यावेळी संपादक श्रीराम पवार, एस. ई. कालेकर, प्रा. आनंद पाटील यांची भाषणे झाली. प्रा. आर. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास व्ही. बी. पाटील, डॉ. वासंती रासम, कुलसचिव व्ही. एम. शिंदे, विश्वनाथ शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. डॉ. वर्षा मेंदगी यांनी आभार मानले. ‘ते’ कुलगुरू झाले नाहीत पात्र असूनही डॉ. जे. एफ. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले नाहीत. ते कुलगुरू झाले असते तर प्रशासकीय कामकाजात अडकले असते. त्यांचा मानवी चेहरा हरवला असता. यामुळे नियतीला ते कुलगुरू व्हावेत असे वाटले नसावे, अशी टिप्पणी डॉ. साबळे यांनी केली.