शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

डी. वाय. पाटील हे राजयोगी

By admin | Updated: February 15, 2016 01:08 IST

सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार : डी. वाय. पाटील ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : संत गाडगे महाराज हे सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांच्या शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कार्याचे २१ व्या शतकात विस्तारीकरण करणारे डॉ. डी. वाय. पाटील हे आजच्या काळातील अध्यात्माच्या दृष्टीतून पाहता खरे राजयोगी आहेत, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.येथील संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे आयोजित संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हायस्कूल, महाविद्यालये सुरू केली. त्यांचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी विद्यापीठ सुरू करून पुढे नेले. वसंतदादा यांनी दिलेली हाक आणि समाजाच्या शिक्षणाच्या गरजेवेळी ते पुढे आले आणि त्यांनी शिक्षण संस्था उभारून ज्ञाननिर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे. देशमुख म्हणाले, राहणीमान नव्हे, तर जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी जगा, समृद्धपणे जगा, भेदभाव टाळा, अशी शिकवण संतांनी दिली. ज्यांचा सहवास हवाहवासा वाटतो ते खऱ्या अर्थाने आताचे संत आहेत.डॉ. शिंदे म्हणाले, माणसातील देव शिक्षणाच्या माध्यमातून शोधता येतो. या माध्यमातून डी. वाय. दादांनी माणसांचा शोध घेत ज्ञानसाम्राज्य उभे केले आहे. नवनवे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करून त्यांनी समाजाला आदर्श घालून दिला आहे.डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, परमेश्वर माणसामध्ये पाहायला शिका. आपण जे विचार पेरतो तेच उगवितात; त्यामुळे सकारात्मक विचार करा. आजचा हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. कार्यक्रमास संत गाडगे महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता यादव, एम. डी. देसाई, श्याम कुरळे, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार अरविंद पोवार यांनी गौरवगीत सादर केले. टी. आर. गुरव यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी स्वागत केले. अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. संतांच्या पालखीची परंपरामहाराष्ट्रात श्रीमंती, पद, प्रतिष्ठा मिळविलेल्यांच्यापेक्षा संतांची पालखी वाहण्याची परंपरा आहे. अशी परंपरा असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामुळे या संतांचे आपण वारसदार असून, त्यांच्या जीवनातील काही अंशाने तरी आपण जगले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.