शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

डी. वाय. पाटील हे राजयोगी

By admin | Updated: February 15, 2016 01:08 IST

सदानंद मोरे यांचे गौरवोद्गार : डी. वाय. पाटील ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : संत गाडगे महाराज हे सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांच्या शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कार्याचे २१ व्या शतकात विस्तारीकरण करणारे डॉ. डी. वाय. पाटील हे आजच्या काळातील अध्यात्माच्या दृष्टीतून पाहता खरे राजयोगी आहेत, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी येथे काढले.येथील संत गाडगे महाराज अध्यासनातर्फे आयोजित संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले यांनी प्राथमिक शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हायस्कूल, महाविद्यालये सुरू केली. त्यांचे कार्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी विद्यापीठ सुरू करून पुढे नेले. वसंतदादा यांनी दिलेली हाक आणि समाजाच्या शिक्षणाच्या गरजेवेळी ते पुढे आले आणि त्यांनी शिक्षण संस्था उभारून ज्ञाननिर्मितीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात बदल करणे आवश्यक आहे. देशमुख म्हणाले, राहणीमान नव्हे, तर जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी जगा, समृद्धपणे जगा, भेदभाव टाळा, अशी शिकवण संतांनी दिली. ज्यांचा सहवास हवाहवासा वाटतो ते खऱ्या अर्थाने आताचे संत आहेत.डॉ. शिंदे म्हणाले, माणसातील देव शिक्षणाच्या माध्यमातून शोधता येतो. या माध्यमातून डी. वाय. दादांनी माणसांचा शोध घेत ज्ञानसाम्राज्य उभे केले आहे. नवनवे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करून त्यांनी समाजाला आदर्श घालून दिला आहे.डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, परमेश्वर माणसामध्ये पाहायला शिका. आपण जे विचार पेरतो तेच उगवितात; त्यामुळे सकारात्मक विचार करा. आजचा हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. कार्यक्रमास संत गाडगे महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता यादव, एम. डी. देसाई, श्याम कुरळे, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार अरविंद पोवार यांनी गौरवगीत सादर केले. टी. आर. गुरव यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी स्वागत केले. अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. संतांच्या पालखीची परंपरामहाराष्ट्रात श्रीमंती, पद, प्रतिष्ठा मिळविलेल्यांच्यापेक्षा संतांची पालखी वाहण्याची परंपरा आहे. अशी परंपरा असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामुळे या संतांचे आपण वारसदार असून, त्यांच्या जीवनातील काही अंशाने तरी आपण जगले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.