शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुन्हेगारीचा बिमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST

गुन्हेगारी क्षेत्राचा विस्तार पोलीस खात्याची चिंता वाढवणारी बाब बनली आहे, पण या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस नवनवीन अत्याधुनिक ...

गुन्हेगारी क्षेत्राचा विस्तार पोलीस खात्याची चिंता वाढवणारी बाब बनली आहे, पण या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस नवनवीन अत्याधुनिक साधनांचा, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन हे वेळेत घटनास्थळी पोहचणे हे तितकेच महत्त्वाचे असते. पोलीस घटनास्थळी वेळेत पोहचल्यानंतर परिस्थती नियंत्रणात आणण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२ नंबर डायल’ करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. ही अतिशयोक्ती नव्हे, केंद्र सरकारने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली आहे, या नव्या यंत्रणेचे नियंत्रण हे नवी मुंबईतून होत आहे. चोवीस तास सेवेत तत्पर असणारी ही नवी अत्याधुनिक यंत्रणा गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार हे निश्चित.

विनाकाम झटपट पैसे कमवण्याचे आजच्या दिशाहीन बनलेल्या तरुण पिढीचे स्वप्ने देशहिताला मारक ठरत आहेत. रुबाबात चारचाकी आलिशान वाहनातून फिरण्याचे प्रमुख स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पिढी चोरी, घरफोडी तसेच गुंडगिरी, अवैध व्यवसायाचा आसरा घेत आहेत. गुंडगिरीच्या मायाजालमध्ये तरुण पिढी गुरफटत निघाली आहे, त्यातून काही राजकारणी अमाप पैशांचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असल्याचेही उघड आहे. तरुण मुलांकडून प्रसंगी सहज पैसे मिळवण्यासाठी तस्करीचाही मार्ग अवलंबायला जात आहे. आर्थिक विवंचनेत असलेले हे तरुण आपोआपच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले जात आहे. गुन्हेगारीचा वाढता विस्तार पोलीस प्रशासनासमोर आव्हान बनला आहे. गुन्हेगारीला रोखण्यासाठी अमेरिकेच्या धरतीवर महाराष्ट्रात केंद्र सरकारने नवा उपक्रम सुरू केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला नेस्तानाबूत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. कोणत्याही ठिकाणी, कोणतीही घटना घडो, अगर एखाद्याच्या संशयास्पद हालचाली, अगर आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी आहे अशा वेळी संबंधिताने फोनवरून ११२ नंबर डायल केल्यास त्याला अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाने वाढती गुन्हेगारी कमी होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्याही कोना-कोपऱ्यातून पोलिसांच्या ११२ नंबरला डायल केल्यास त्याचे केंद्रीकरण नवी मुंबइत केले आहे. तो फोन थेट नवी मुंबई येथील नियंत्रण कक्षात जाणार आहे. तेथे या फोनचे लोकेशन दिसणार आहे. तेथून ज्या भागातून फोन आला, त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाला नवी मुंबईतून फोन जाऊन त्यांना आलेल्या फोनचे लोकेशन दिले जाणार आहे. ज्या भागातून फोन कॉल आला, त्या परिसरातील पोलिसांच्या बीट मार्शल व्हॅनला संदेश देऊन ते तातडीने घटनास्थळी पोहचतील. त्यामुळे फोन कॉल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहून परिस्थितीचा सामना करणार आहेत. एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी कृत्य घडत असेल तर या नव्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे त्याला आळा बसण्यास मदत होईल. राज्यात फोनवर तक्रारींचा ओघ वाढल्यास नवी मुंबईतील नियंत्रण कक्षावर भलताच ताण पडणार आहे, त्यानंतर याच नियंत्रण कक्षाचे नागपूर येथेही एक विभागीय कार्यालय सुरू करण्यात येईल आहे. या महाराष्ट्राचे आधुनिक तंत्रज्ञानात दोन भाग करून जास्तीत जास्त पोलीस यंत्रणा सक्रिय ठेवण्याचा पोलीस दलाचा कयास आहे. ही गतिमान यंत्रणा म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राचा कर्दनकाळ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार

270821\27kol_8_27082021_5.jpg~270821\27kol_9_27082021_5.jpg

फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार~फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार