शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

महावितरणच्या ‘त्या’ ग्राहकांना मिळणार व्याजासह परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:22 IST

नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपर्यंत तारा जोडणे आणि मीटरचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले होते.

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपर्यंत तारा जोडणे आणि मीटरचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले होते. या वीजग्राहकांना व्याजासह त्यांची रक्कम परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून परतावा देण्याचे परिपत्रक महावितरणने जारी केले आहे.नवीन जोडणी देण्यासाठी विजेचे खांब व तारा टाकावयाच्या असतील तर त्याचा खर्च ओआरसी किंवा ओआरसीपी या नावाखाली संबंधित वीज ग्राहकाकडून जानेवारी २००५पासून आकारला जात असे. तसेच सप्टेंबर २००६नंतर नवीन जोडणी देण्यासाठी खांबापासून मीटरपर्यंत तार टाकण्यासाठी (सर्व्हिस लाईन चार्ज) व मीटरची किंमत महावितरणने घेतली होती. याच्याविरोधात वीज कायद्यान्वये ऊर्जा नियामक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेने दाखल केलेल्या या तक्रारीवर सुनावणी होऊन १७ मे २००७ व २१ आॅगस्ट २००७ रोजीच्या निकालाप्रमाणे सर्व वीज ग्राहकांना व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी, असे आदेश ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणला दिले होते. मात्र, महावितरणने याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वीज ग्राहकांच्याच बाजूने निर्णय दिला. म्हणजे ऊर्जा नियामक आयोगाचा निकाल कायम ठेवला. ही न्यायालयीन लढाई वीज ग्राहक संघटनेने तब्बल दहा वर्षे लढली.आता महावितरण कंपनीने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे महावितरण कंपनीने म्हटले आहे, २० जानेवारी २००५ ते ३० एप्रिल २००७ या कालावधीमध्ये नव्याने जोडणी दिलेल्या ज्या ग्राहकांकडून ओआरसी किंवा ओआरसीपी, तसेच एसएलसी व मीटरची किंमत घेतली आहे, त्या ग्राहकांना हा परतावा द्यावा, असेही या पत्रकात नमूद केले आहे.राज्यातील अशा वीज ग्राहकांना सुमारे ९०० कोटी रुपये परतावा मिळणार आहे.