शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’

By admin | Updated: February 12, 2015 00:21 IST

वि. भा. देशपांडे : प्रबोधन पडले बाजूला; विद्यापीठात संगीत-नाट्यशास्त्र विभाग राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : मराठी रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सातत्याने लिहिणारे द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे आहे. या रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या विभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. देशपांडे म्हणाले, अर्थकारण, समाजकारण, आदींचा परिणाम प्रेक्षकांच्या जीवनशैलीवर होतो, त्यातून मानसिकता बदलते. सध्या कमी वेळात चटपटीत पाहण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत प्रबोधन बाजूला पडले आणि उथळ मनोरंजनाने त्याची जागा घेतली आहे. एकीकडे प्रवाहीपणाचा आग्रह कायम असतानाच नाटकांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पाच अंकांवरून तीन अंकांवर आलेले नाटक आता, तर दोन अंकी, एकांकिका किंवा दीर्घांकी बनले असून, त्याचा एकूण दर्जावर परिणाम झाल्याचे दिसते. रंगभूमी टिकण्यासाठी लेखन करणाऱ्यांत तसेच प्रयोग सादर करणाऱ्यांत सातत्याचा अभाव आहे. दमदार लिहिणारे युवक आजही आहेत; पण काळाच्या प्रवाहात ते पुढे कुठे लुप्त होतात, ते समजत नाही. हा सातत्याचा अभाव रंगभूमीला मारक आहे. लेखनात ताकद असेल, तरच ती भूमिका कलाकारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आज तसे दिसत नाही. मराठी माणसाच्या आयुष्यात मराठी रंगभूमीचे स्थान मोठे आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा घसरत चाललेला दर्जा पाहता प्रेक्षकांसाठीही रसास्वाद कार्यशाळा व्हाव्यात. सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असलेली ही रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी भाषांतर, रूपांतर या गोष्टी आवश्यक आहेत. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, रंगभूमीच्या क्षेत्रातील जागतिक, स्थानिक बदलते प्रवाह समजून घेण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, विश्वनाथ शिंदे, केशव देशपांडे, आदी उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी स्वागत केले. आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. निखिल भगत यांनी आभार मानले.स्पर्धांचे अमाप पीक...दहा वर्षांत रंगभूमीशी निगडित स्पर्धांचे अमाप पीक आले आहे. त्यांचा पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी, दूरचित्रवाणी व रूपेरी पडद्याकडे जाण्यासाठी वापर केला जातो आहे, हे चिंताजनक असल्याचे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले.