शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’

By admin | Updated: February 12, 2015 00:21 IST

वि. भा. देशपांडे : प्रबोधन पडले बाजूला; विद्यापीठात संगीत-नाट्यशास्त्र विभाग राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : मराठी रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सातत्याने लिहिणारे द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे आहे. या रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या विभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. देशपांडे म्हणाले, अर्थकारण, समाजकारण, आदींचा परिणाम प्रेक्षकांच्या जीवनशैलीवर होतो, त्यातून मानसिकता बदलते. सध्या कमी वेळात चटपटीत पाहण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत प्रबोधन बाजूला पडले आणि उथळ मनोरंजनाने त्याची जागा घेतली आहे. एकीकडे प्रवाहीपणाचा आग्रह कायम असतानाच नाटकांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पाच अंकांवरून तीन अंकांवर आलेले नाटक आता, तर दोन अंकी, एकांकिका किंवा दीर्घांकी बनले असून, त्याचा एकूण दर्जावर परिणाम झाल्याचे दिसते. रंगभूमी टिकण्यासाठी लेखन करणाऱ्यांत तसेच प्रयोग सादर करणाऱ्यांत सातत्याचा अभाव आहे. दमदार लिहिणारे युवक आजही आहेत; पण काळाच्या प्रवाहात ते पुढे कुठे लुप्त होतात, ते समजत नाही. हा सातत्याचा अभाव रंगभूमीला मारक आहे. लेखनात ताकद असेल, तरच ती भूमिका कलाकारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आज तसे दिसत नाही. मराठी माणसाच्या आयुष्यात मराठी रंगभूमीचे स्थान मोठे आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा घसरत चाललेला दर्जा पाहता प्रेक्षकांसाठीही रसास्वाद कार्यशाळा व्हाव्यात. सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असलेली ही रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी भाषांतर, रूपांतर या गोष्टी आवश्यक आहेत. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, रंगभूमीच्या क्षेत्रातील जागतिक, स्थानिक बदलते प्रवाह समजून घेण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, विश्वनाथ शिंदे, केशव देशपांडे, आदी उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी स्वागत केले. आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. निखिल भगत यांनी आभार मानले.स्पर्धांचे अमाप पीक...दहा वर्षांत रंगभूमीशी निगडित स्पर्धांचे अमाप पीक आले आहे. त्यांचा पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी, दूरचित्रवाणी व रूपेरी पडद्याकडे जाण्यासाठी वापर केला जातो आहे, हे चिंताजनक असल्याचे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले.