शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’

By admin | Updated: February 12, 2015 00:21 IST

वि. भा. देशपांडे : प्रबोधन पडले बाजूला; विद्यापीठात संगीत-नाट्यशास्त्र विभाग राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : मराठी रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सातत्याने लिहिणारे द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे आहे. या रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या विभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. देशपांडे म्हणाले, अर्थकारण, समाजकारण, आदींचा परिणाम प्रेक्षकांच्या जीवनशैलीवर होतो, त्यातून मानसिकता बदलते. सध्या कमी वेळात चटपटीत पाहण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत प्रबोधन बाजूला पडले आणि उथळ मनोरंजनाने त्याची जागा घेतली आहे. एकीकडे प्रवाहीपणाचा आग्रह कायम असतानाच नाटकांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पाच अंकांवरून तीन अंकांवर आलेले नाटक आता, तर दोन अंकी, एकांकिका किंवा दीर्घांकी बनले असून, त्याचा एकूण दर्जावर परिणाम झाल्याचे दिसते. रंगभूमी टिकण्यासाठी लेखन करणाऱ्यांत तसेच प्रयोग सादर करणाऱ्यांत सातत्याचा अभाव आहे. दमदार लिहिणारे युवक आजही आहेत; पण काळाच्या प्रवाहात ते पुढे कुठे लुप्त होतात, ते समजत नाही. हा सातत्याचा अभाव रंगभूमीला मारक आहे. लेखनात ताकद असेल, तरच ती भूमिका कलाकारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आज तसे दिसत नाही. मराठी माणसाच्या आयुष्यात मराठी रंगभूमीचे स्थान मोठे आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा घसरत चाललेला दर्जा पाहता प्रेक्षकांसाठीही रसास्वाद कार्यशाळा व्हाव्यात. सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असलेली ही रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी भाषांतर, रूपांतर या गोष्टी आवश्यक आहेत. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, रंगभूमीच्या क्षेत्रातील जागतिक, स्थानिक बदलते प्रवाह समजून घेण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, विश्वनाथ शिंदे, केशव देशपांडे, आदी उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी स्वागत केले. आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. निखिल भगत यांनी आभार मानले.स्पर्धांचे अमाप पीक...दहा वर्षांत रंगभूमीशी निगडित स्पर्धांचे अमाप पीक आले आहे. त्यांचा पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी, दूरचित्रवाणी व रूपेरी पडद्याकडे जाण्यासाठी वापर केला जातो आहे, हे चिंताजनक असल्याचे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले.