शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांबाबत उत्सुकता

By admin | Updated: October 23, 2014 00:45 IST

सत्तांतराचा परिणाम : कोल्हापूरच्या रखडलेल्या कामांना गतीची गरज

कोल्हापूर : पंधरा वर्षांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीनंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे भाजपतर्फे कोण मुख्यमंत्री होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे. ... तरीही पालकमंत्री पाटीलचकोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी दहा वर्षे कमांड सांभाळली. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण असे तीन मुख्यमंत्री झाले; पण हर्षवर्धन पाटील मात्र पालकमंत्री म्हणून कायम राहिले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारदरबारी राजकीय वजन वापरून निधी आणला. पण, शाहू जन्मभूमी विकास, चित्रनगरी, शाहू स्मारक आराखडा, गारमेंट पार्क, पंचगंगा प्रदूषण रोखण्याची उपाययोजना अशी महत्त्वाची कामे रेंगाळली आहेत. पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरला ते वेळ देत नाहीत, जनतेला भेटत नाहीत अशा तक्रारी सुरू झाल्या. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी आणि जिल्हा नियोजनाची बैठक यासाठीच ते कोल्हापुरात येत राहिले. टोलविरोधात लढणाऱ्या आंदोलकांची तर त्यांनी अवहेलनाच केली. त्यामुळे ‘पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री’ अशा शब्दांत त्यांची तुलना करण्यात आली.राजकारणातही ढवळाढवळ पाटील हे देशमुख गटाचे. त्यामुळे पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असताना सतेज पाटील यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. याउलट त्यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना जुळवून घेतले होते. त्यामुळे काँग्रेसचे असूनही गटतटाचा विचार होत गेला. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दोन कदमांच्या दोन तऱ्हाहर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरला म्हणावा तेवढा वेळ दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या आधी पालकमंत्री म्हणून पतंगराव कदम (काँग्रेस), रामदास कदम ( शिवसेना) यांनीही काम केले. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी होती. पतंगराव कदम हे वडीलकीच्या नात्याने बोलून काम करून घेत होते, तर रामदास कदम तर रोखठोक बोलत होते. त्यांच्या बोलण्यात ‘दम’ असायचा.भेटणारा पालकमंत्री हवा राज्यात भाजप व शिवसेना यांचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर भाजपतर्फे सुरेश हाळवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे नव्या मंत्र्यांच्या यादीत चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्री यापैकीच एक होणार की, अन्य कोणी येणार याबाबत राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते, अधिकारी यांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता लवकर संपुष्टात येण्याची शक्यता आहे.