शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पालकमंत्र्यांबाबत उत्सुकता

By admin | Updated: October 23, 2014 00:45 IST

सत्तांतराचा परिणाम : कोल्हापूरच्या रखडलेल्या कामांना गतीची गरज

कोल्हापूर : पंधरा वर्षांच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीनंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे भाजपतर्फे कोण मुख्यमंत्री होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे. ... तरीही पालकमंत्री पाटीलचकोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी दहा वर्षे कमांड सांभाळली. विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण असे तीन मुख्यमंत्री झाले; पण हर्षवर्धन पाटील मात्र पालकमंत्री म्हणून कायम राहिले. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारदरबारी राजकीय वजन वापरून निधी आणला. पण, शाहू जन्मभूमी विकास, चित्रनगरी, शाहू स्मारक आराखडा, गारमेंट पार्क, पंचगंगा प्रदूषण रोखण्याची उपाययोजना अशी महत्त्वाची कामे रेंगाळली आहेत. पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरला ते वेळ देत नाहीत, जनतेला भेटत नाहीत अशा तक्रारी सुरू झाल्या. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी आणि जिल्हा नियोजनाची बैठक यासाठीच ते कोल्हापुरात येत राहिले. टोलविरोधात लढणाऱ्या आंदोलकांची तर त्यांनी अवहेलनाच केली. त्यामुळे ‘पालकमंत्री नव्हे पर्यटनमंत्री’ अशा शब्दांत त्यांची तुलना करण्यात आली.राजकारणातही ढवळाढवळ पाटील हे देशमुख गटाचे. त्यामुळे पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असताना सतेज पाटील यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. याउलट त्यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना जुळवून घेतले होते. त्यामुळे काँग्रेसचे असूनही गटतटाचा विचार होत गेला. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दोन कदमांच्या दोन तऱ्हाहर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरला म्हणावा तेवढा वेळ दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या आधी पालकमंत्री म्हणून पतंगराव कदम (काँग्रेस), रामदास कदम ( शिवसेना) यांनीही काम केले. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी होती. पतंगराव कदम हे वडीलकीच्या नात्याने बोलून काम करून घेत होते, तर रामदास कदम तर रोखठोक बोलत होते. त्यांच्या बोलण्यात ‘दम’ असायचा.भेटणारा पालकमंत्री हवा राज्यात भाजप व शिवसेना यांचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. कोल्हापुरातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर भाजपतर्फे सुरेश हाळवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे नव्या मंत्र्यांच्या यादीत चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्री यापैकीच एक होणार की, अन्य कोणी येणार याबाबत राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते, अधिकारी यांच्यात उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता लवकर संपुष्टात येण्याची शक्यता आहे.