शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

पालमध्ये चाऱ्यासाठी ऊस कापला; जनावरेही विकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:52 IST

श्रीकांत ºहायकर । लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा ...

श्रीकांत ºहायकर ।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा खजिना’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रचंड झळा बसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजूस असणाºया धामोड परिसरातील बहुतांशी वाड्या-वस्त्यांवर टंचाई आहे. पाल बुद्रुकचा पाणीप्रश्न तर ‘रात्रंदिन आम्हा पाणीयुद्धाचा प्रसंग’ अशा बनला आहे. पाण्याअभावी लोकांनी कवडीमोल दराने जनावरे विकली आहेत. काही शेतकऱ्यांनी हाताशी आलेली ऊसपिके चाºयासाठी कापली आहेत.साधारणत: ५०० लोकवस्ती असणारे गाव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या गावासाठी दहा वर्षांपूर्वी ‘केकतीचा झरा’ नावाच्या ओढ्याजवळून गावाशेजारील टाकीत सायफनने पाणी टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले; पण गेल्या ४० ते ५० वर्षांत पहिल्यांदाच ह्या झºयाचे पाणी यावर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून आणत आहेत. ऊसपीक तर हातचे केव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्थ आणि जनावरांना या भीषण टंचाईस गेल्या एक महिन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आम्हाला झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी टाहो फोडणारे नागरिक करत आहेत. वेळोवेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवत केवळ मतांचे राजकारण करणाºयांना येथील नागरिकांनी पाण्यासाठी वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत; पण ही निवेदने धूळखात पडल्याची परखड भावना काही महिलांनी बोलून दाखवली.पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन गावकºयांनी ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करत दोन कूपनलिका खोदल्या; पण या कूपनलिकांना पाणी लागले नाही म्हणून पुन्हा एकदा प्रत्येक कुटुंबाला १४०० रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसांत पुन्हा दुसरी कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे होऊनही या समस्येकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.संतप्त झालेले गावातील नागरिक आता एकवटले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी आणि ठोस निर्णय तातडीने घेण्याची मागणी होतआहे.