शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

पालमध्ये चाऱ्यासाठी ऊस कापला; जनावरेही विकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:52 IST

श्रीकांत ºहायकर । लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा ...

श्रीकांत ºहायकर ।लोकमत न्यूज नेटवर्कधामोड : ‘पाणीदार जिल्हा' अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असताना व त्यातल्या त्यात ‘पाण्याचा खजिना’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती पावलेल्या राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रचंड झळा बसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजूस असणाºया धामोड परिसरातील बहुतांशी वाड्या-वस्त्यांवर टंचाई आहे. पाल बुद्रुकचा पाणीप्रश्न तर ‘रात्रंदिन आम्हा पाणीयुद्धाचा प्रसंग’ अशा बनला आहे. पाण्याअभावी लोकांनी कवडीमोल दराने जनावरे विकली आहेत. काही शेतकऱ्यांनी हाताशी आलेली ऊसपिके चाºयासाठी कापली आहेत.साधारणत: ५०० लोकवस्ती असणारे गाव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. या गावासाठी दहा वर्षांपूर्वी ‘केकतीचा झरा’ नावाच्या ओढ्याजवळून गावाशेजारील टाकीत सायफनने पाणी टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले; पण गेल्या ४० ते ५० वर्षांत पहिल्यांदाच ह्या झºयाचे पाणी यावर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून आणत आहेत. ऊसपीक तर हातचे केव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्थ आणि जनावरांना या भीषण टंचाईस गेल्या एक महिन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या भागातील पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन आम्हाला झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी टाहो फोडणारे नागरिक करत आहेत. वेळोवेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे गाजर दाखवत केवळ मतांचे राजकारण करणाºयांना येथील नागरिकांनी पाण्यासाठी वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत; पण ही निवेदने धूळखात पडल्याची परखड भावना काही महिलांनी बोलून दाखवली.पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन गावकºयांनी ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करत दोन कूपनलिका खोदल्या; पण या कूपनलिकांना पाणी लागले नाही म्हणून पुन्हा एकदा प्रत्येक कुटुंबाला १४०० रुपयांप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसांत पुन्हा दुसरी कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे होऊनही या समस्येकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.संतप्त झालेले गावातील नागरिक आता एकवटले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी आणि ठोस निर्णय तातडीने घेण्याची मागणी होतआहे.