शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कबनूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 5, 2015 00:10 IST

वाहतुकीचाही बोजवारा : जलस्वराज्य प्रकल्प ‘असून अडचण नसून खोळंबा’, कचरा डेपोमुळे कायमच दुर्गंधी--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

अतुल आंबी --इचलकरंजी--कबनूर (ता. हातकणंगले) येथे पिण्याच्या पाण्यासह मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न, त्याचबरोबर डिजिटल फलकांचा विळखा हे प्रश्न प्रामुख्याने गंभीर बनले आहेत. इचलकरंजी शहराजवळील सर्वांत मोठे गाव असूनही कबनूरमधील अनेक समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.कबनूर येथे चार वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प उभारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. मात्र, या प्रकल्पाच्या निर्मितीमधील त्रुटींमुळे वारंवार नादुरुस्त होऊन पाणी शुद्धिकरण प्रक्रिया ठप्प होते. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना मोठी अडचण निर्माण होते. गावभागात दोन ते तीन दिवस, तर वाढीव वसाहतींमध्ये आठ दिवसांतून एक वेळ असा पाणीपुरवठा काही वेळा केला जातो. या पाणीप्रश्नावरून अनेकवेळा महिलांनी आंदोलने केली आहेत. येथील जलस्वराज्य प्रकल्प हस्तांतरण करण्याचेही काम प्रलंबितच आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पूर्णपणे या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. हा पेच सोडविण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.ग्रामपंचायतीच्यावतीने सात लाख रुपयांचा गांडूळ खत प्रकल्पही राबविण्यात आला. मात्र, त्यामध्येही गांडुळांचे व खतांचे प्रमाण कमी असून, ग्रामपंचायतीला त्याचा म्हणावा तसा लाभ झाला नाही. पंचायतीच्या दुर्लक्षपणामुळेच हा प्रकार घडला. इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर जाताना कबनूर गावातूनच पुढे जावे लागते. तसेच साखर कारखान्यामुळे हंगाम काळात वाढणारी उसाची वाहतूक तसेच गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या जंदीसो ब्रॉनसो दर्ग्याला होणारी भाविकांची गर्दी अशा कारणांमुळे कबनूर चौकात रहदारीचा प्रश्न खूपच कठीण बनला आहे. तसेच कबनूर येथील अंतर्गत रस्तेही खूप वर्षांपासून दुरावस्थेत आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे. इचलकरंजी नाक्यापासून ते कबनूर ओढ्यापर्यंत उड्डाण पुलावरून या ट्रॅफिक जामवर मार्ग काढला जाऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे.गावामध्ये अनेक चौकांत डिजिटल फलकांनी विळखा घातल्यामुळे गावाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतीने गावसभेत ठराव करून याबाबत निर्णय घ्यावा, असे नागरिकांचे मत आहे. कबनूरचा कचरा डेपो ओढ्याच्या वरील बाजूस कोल्हापूर रोडलगत आहे. तेथेही वारंवार आग लागून कचऱ्यासह प्लास्टिक जळून परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व समस्यांवर लक्ष घालून लोकप्रतिनिधींनी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (समाप्त)बॉयलरमधील राखेमुळे समस्याकबनूर येथील साखर कारखान्यामुळेही हंगाम काळात बॉयलरमधून राख उडून कबनूरसह इचलकरंजीमधील काही भागात घरांवर, तसेच बाहेर लावलेल्या गाड्यांवर, वाळत घातलेल्या कपड्यांवर पडून काळे होत असल्याने याचाही नागरिकांना त्रास होतो. साखर कारखाना प्रशासनाने जादा फॅन लावून हा प्रश्न सोडविणार असल्याचे गतवर्षी आंदोलकांना सांगितले होते. मात्र, तसे घडले नाही.