शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कबनूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 5, 2015 00:10 IST

वाहतुकीचाही बोजवारा : जलस्वराज्य प्रकल्प ‘असून अडचण नसून खोळंबा’, कचरा डेपोमुळे कायमच दुर्गंधी--मोठ्या गावांच्या मोठ्या समस्या

अतुल आंबी --इचलकरंजी--कबनूर (ता. हातकणंगले) येथे पिण्याच्या पाण्यासह मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न, त्याचबरोबर डिजिटल फलकांचा विळखा हे प्रश्न प्रामुख्याने गंभीर बनले आहेत. इचलकरंजी शहराजवळील सर्वांत मोठे गाव असूनही कबनूरमधील अनेक समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.कबनूर येथे चार वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प उभारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. मात्र, या प्रकल्पाच्या निर्मितीमधील त्रुटींमुळे वारंवार नादुरुस्त होऊन पाणी शुद्धिकरण प्रक्रिया ठप्प होते. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना मोठी अडचण निर्माण होते. गावभागात दोन ते तीन दिवस, तर वाढीव वसाहतींमध्ये आठ दिवसांतून एक वेळ असा पाणीपुरवठा काही वेळा केला जातो. या पाणीप्रश्नावरून अनेकवेळा महिलांनी आंदोलने केली आहेत. येथील जलस्वराज्य प्रकल्प हस्तांतरण करण्याचेही काम प्रलंबितच आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पूर्णपणे या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. हा पेच सोडविण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.ग्रामपंचायतीच्यावतीने सात लाख रुपयांचा गांडूळ खत प्रकल्पही राबविण्यात आला. मात्र, त्यामध्येही गांडुळांचे व खतांचे प्रमाण कमी असून, ग्रामपंचायतीला त्याचा म्हणावा तसा लाभ झाला नाही. पंचायतीच्या दुर्लक्षपणामुळेच हा प्रकार घडला. इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर जाताना कबनूर गावातूनच पुढे जावे लागते. तसेच साखर कारखान्यामुळे हंगाम काळात वाढणारी उसाची वाहतूक तसेच गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या जंदीसो ब्रॉनसो दर्ग्याला होणारी भाविकांची गर्दी अशा कारणांमुळे कबनूर चौकात रहदारीचा प्रश्न खूपच कठीण बनला आहे. तसेच कबनूर येथील अंतर्गत रस्तेही खूप वर्षांपासून दुरावस्थेत आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे. इचलकरंजी नाक्यापासून ते कबनूर ओढ्यापर्यंत उड्डाण पुलावरून या ट्रॅफिक जामवर मार्ग काढला जाऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे.गावामध्ये अनेक चौकांत डिजिटल फलकांनी विळखा घातल्यामुळे गावाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतीने गावसभेत ठराव करून याबाबत निर्णय घ्यावा, असे नागरिकांचे मत आहे. कबनूरचा कचरा डेपो ओढ्याच्या वरील बाजूस कोल्हापूर रोडलगत आहे. तेथेही वारंवार आग लागून कचऱ्यासह प्लास्टिक जळून परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व समस्यांवर लक्ष घालून लोकप्रतिनिधींनी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (समाप्त)बॉयलरमधील राखेमुळे समस्याकबनूर येथील साखर कारखान्यामुळेही हंगाम काळात बॉयलरमधून राख उडून कबनूरसह इचलकरंजीमधील काही भागात घरांवर, तसेच बाहेर लावलेल्या गाड्यांवर, वाळत घातलेल्या कपड्यांवर पडून काळे होत असल्याने याचाही नागरिकांना त्रास होतो. साखर कारखाना प्रशासनाने जादा फॅन लावून हा प्रश्न सोडविणार असल्याचे गतवर्षी आंदोलकांना सांगितले होते. मात्र, तसे घडले नाही.