शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीमुळे विरोधकांच्या अपप्रचाराला चपराक

By admin | Updated: October 26, 2016 22:27 IST

महाराष्ट्रासह कर्नाटकातीलही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित ऊस परिषद ठरली उच्चांकी

जयसिंगपूर : मंगळवारी जयसिंगपूर येथे अग्रगण्य संख्येत ऊस परिषद पार पडली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पहिली उचल ३२०० रुपये द्या, या मागणीसाठी ऊस परिषदेत रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानीकडून आतापर्यंत चौदा ऊस परिषद घेण्यात आल्या. मात्र, १५ व्या ऊस परिषदेसाठी उच्चांकी गर्दी झाल्याने विरोधक व सोशल मीडियावरती फिरणाऱ्या चुकीच्या मेसिजना मूठमाती मिळाली आहे. गेल्या महिनाभरापासून २५ आॅक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे होणार आहे. अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. तसेच या ऊस परिषदेत एफआरपीचा मुद्दा नसल्यामुळे या ऊस परिषदेत फक्त दराचा निर्णय असल्यामुळे या ऊस परिषदेला गर्दी होणार नाही, असे मत जाणकार व्यक्ती व विविध राजकीय पक्षांकडून व सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी, कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा, सांगली, कोल्हापूर, सातारा यासह अनेक जिल्हे तसेच कर्नाटकच्या सीमा भागात ऊस परिषदेच्या बैठका घेऊन परिषदेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बैठका, मेळावे, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंगळवारी ऊस परिषदेच्या दिवशी दुपारपर्यंत ऊस परिषदेला महत्त्व नाही. तसेच भाजप सत्तेत स्वाभिमानी हा मित्रपक्ष असल्याने आता काय दर मागणार आहेत. जादा ऊसदर मागणी होणार नाही आणि उत्साह कमी असल्याचे सोशल मीडियावर मेसेज फिरत होते. मात्र, महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या घामाचा दाम मिळविण्यासाठी परिषदेला हजर राहिल्याने विरोधक व सोशल मीडियाच्या संदेशाना मूठमाती मिळाली आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा अंदाज खरास्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १५ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. याबाबतचे दैनिक ‘लोकमत’ने रविवारी (दि.२३) ‘ऊस परिषद ठरणार उच्चांकी’ या मथळ्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. या अनुषंगाने मंगळवारी (दि.२५) झालेल्या ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील शेतकरी उच्चांकी संख्येने उपस्थित राहिल्याने ‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला आहे.