शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

रोजच भाजी खरेदीसाठी गर्दी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून ...

कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून प्रबोधन सुरू आहे, कारवाई केली जात आहे तरी काही रोज बाजारात येऊन भाजी, किराणा खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. शहरातील बाजारपेठा कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट असतानाही अगदी बेफिकिरीने नागरिकांचे आणि विक्रेत्यांचेही वर्तन असल्याचे बुधवारी शहरात दिसून आले.

राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रोज सरासरी पंधरा रुग्ण आढळत आहेत. रोज अंदाजे ५० जणांचे मृत्यू होत आहेत. या रुग्णांना सोयीसुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची अक्षरश: दमछाक होत आहे, तरीही ते नागरिकांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी, त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी जीवाचे रान करत असताना दुसरीकडे नागरिक मात्र बेफिकिरीने शहरात फिरत आहेत.

आता शहरासह उपनगरात रस्त्याकडे, चौकाचौकात भाजी घेऊन विक्रेते बसलेले असतात, फळवाले असतात, सर्वत्र किराणा दुकाने आहेत; पण अट्टाहासाने लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, गंगावेश अशा मुख्य बाजारपेठेत येऊनच लोक भाज्यांसह किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रोज हाताला पिशवी अडकवून बाजारात येणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे.

बुधवारी सकाळपासून शहरात रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड वर्दळ होती. मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत होती. मंडईसह किराणामालाची दुकाने बेकरी, चिरमुरे-फरसाणाच्या दुकानांसमोर गर्दीच गर्दी दिसत होती. दुपारचे बारा वाजून गेल्यानंतर ही वर्दळ कमी झाली.

---

...अन् प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार

आम्ही होम क्वारंटाइन असताना सगळीकडे फिरणार, संसर्गाचे वाटप करत राहणार, बाजारपेठेत विनामास्क फिरणार, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत दुकानाबाहेर चिकटून उभे राहणार, विक्रेतेदेखील मास्क, हॅन्ड ग्लोव्हजशिवाय भाजी, साहित्य विकणार, वेळ जात नाही म्हणून मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारत बसणार, फेरफटका मारून येणार, नियमांचे पालन करणार नाही अन् रुग्ण कमी होत नाहीत म्हणून प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार, लॉकडाऊन केले की आम्ही जगणार कसं, मग पॅकेज द्या म्हणणार, अशी सगळी मानसिकता आहे. एकीकडे प्रशासनाला सहकार्य करायचं नाही, त्यांचे ऐकायचं नाही आणि दुसरीकडे सगळी जबाबदारी त्यांच्यावर ढकलून मोकळं व्हायचं यामुळेच आज जिल्हा रेड झोनमध्ये असून संसर्ग कमी होत नाही; पण आमचं ऐकतंय कोण, हे प्रशासनाचे दुखणे आहे.