शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

रोजच भाजी खरेदीसाठी गर्दी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून ...

कोल्हापूर : दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग उच्चांकावर आहे, मृत्यू दर जास्त आहे, रुग्णांना बेड मिळेनात, जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाकडून प्रबोधन सुरू आहे, कारवाई केली जात आहे तरी काही रोज बाजारात येऊन भाजी, किराणा खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. शहरातील बाजारपेठा कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट असतानाही अगदी बेफिकिरीने नागरिकांचे आणि विक्रेत्यांचेही वर्तन असल्याचे बुधवारी शहरात दिसून आले.

राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रोज सरासरी पंधरा रुग्ण आढळत आहेत. रोज अंदाजे ५० जणांचे मृत्यू होत आहेत. या रुग्णांना सोयीसुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची अक्षरश: दमछाक होत आहे, तरीही ते नागरिकांचा संसर्गापासून बचाव करण्यासाठी, त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी जीवाचे रान करत असताना दुसरीकडे नागरिक मात्र बेफिकिरीने शहरात फिरत आहेत.

आता शहरासह उपनगरात रस्त्याकडे, चौकाचौकात भाजी घेऊन विक्रेते बसलेले असतात, फळवाले असतात, सर्वत्र किराणा दुकाने आहेत; पण अट्टाहासाने लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, गंगावेश अशा मुख्य बाजारपेठेत येऊनच लोक भाज्यांसह किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रोज हाताला पिशवी अडकवून बाजारात येणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे.

बुधवारी सकाळपासून शहरात रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड वर्दळ होती. मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत होती. मंडईसह किराणामालाची दुकाने बेकरी, चिरमुरे-फरसाणाच्या दुकानांसमोर गर्दीच गर्दी दिसत होती. दुपारचे बारा वाजून गेल्यानंतर ही वर्दळ कमी झाली.

---

...अन् प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार

आम्ही होम क्वारंटाइन असताना सगळीकडे फिरणार, संसर्गाचे वाटप करत राहणार, बाजारपेठेत विनामास्क फिरणार, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत दुकानाबाहेर चिकटून उभे राहणार, विक्रेतेदेखील मास्क, हॅन्ड ग्लोव्हजशिवाय भाजी, साहित्य विकणार, वेळ जात नाही म्हणून मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारत बसणार, फेरफटका मारून येणार, नियमांचे पालन करणार नाही अन् रुग्ण कमी होत नाहीत म्हणून प्रशासनाच्या नावाने खडे फोडणार, लॉकडाऊन केले की आम्ही जगणार कसं, मग पॅकेज द्या म्हणणार, अशी सगळी मानसिकता आहे. एकीकडे प्रशासनाला सहकार्य करायचं नाही, त्यांचे ऐकायचं नाही आणि दुसरीकडे सगळी जबाबदारी त्यांच्यावर ढकलून मोकळं व्हायचं यामुळेच आज जिल्हा रेड झोनमध्ये असून संसर्ग कमी होत नाही; पण आमचं ऐकतंय कोण, हे प्रशासनाचे दुखणे आहे.