शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

क्रौर्याचा नंगानाच, माणूसकीची झोप

By admin | Updated: July 23, 2014 22:30 IST

साखरोळी हत्याकांड : दरवाजे ठोठावूनही वाडीतील लोकांचा प्रतिसाद शून्य

शिवाजी गोरे - दापोलीदेवदेवस्की व प्रॉपर्टीच्या वादातून रमेश मिसाळ यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा मुलगा रुपेश गंभीर जखमी, तर दुसरा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात घरात निपचीत पडलेला. वाचवा वाचवा म्हणत प्रणया मिसाळ वाडीतील गाडीवाल्याच्या घरी धावत गेली. परंतु गाडीवाल्याने डिझेल संपले आहे, असे सांगून दार बंद केले. वाळीत टाकलेल्या कुटुंबाला मदत करायची नाही, असा वाडीचाच अलिखित ठराव झाल्याने मिसाळ कुटुंबीयांची जीवन -मरणाची लढाई सुरू असताना वाडीतील एकही ‘माणूस’ तिकडे फिरकला नाही.रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांपासून वाडीतील सर्व लोकांनी बहिष्कार टाकला होता. हत्याकांडने अख्खा तालुका हादरून गेल्याने यामागील कारणांचा उलगडा झालेला नाही. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाला कोणीही मदत करायची नाही, असा अलिखित ठराव झाल्याने तीन निष्पाप जीव वाचवण्यासाठी धावा करत होते, तरी त्यांना वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाही. रमेश मिसाळची पत्नी रुचिता व रुपेश मिसाळ यांची पत्नी प्रणया या दोन्ही महिला वाडीतील प्रत्येकाचे दार ठोठावत जीव वाचवण्यासाठी लोकांकडे मदतीची याचना करत होत्या. आमच्या जखमी झालेल्या कुटुंबीयांना घेऊन दवाखान्यात चला, अशी विनवणी त्या गाडीवाल्यांकडे करत होत्या. मात्र, आपल्या गाडीतील डिझेल संपले म्हणून गावातील गाडीवाल्याने मदत नाकारली, एवढेच नव्हे तर लगेच दारही बंद करून घेतले.वाडीत एवढा भयानक प्रकार घडूनसुद्धा इथे काही घडलेच नाही, असे भासवण्यात आले. रमेश मिसाळ यांचा मृतदेह दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात होता. रुपेश व प्रफुल्ल डेरवण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. कुटुंबावर हल्ला करणाऱ्या ७ जणांना पोलीसकोठडीसाखरोळी नं. १ हनुमानवाडी येथील रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करुन एकाला ठार करून तिघांना जखमी केल्याच्या संशयावरून आरोपी सचिन मिसाळ, किरण मिसाळ, महेश शंकर मिसाळ, मीनाक्षी महेश मिसाळ, राधिका सचिन मिसाळ, सुनंदा संतोष मिसाळ व योगीता संतोष मिसाळ या सातजणांना दापोली न्यायालयात हजर केले असता दापोली न्यायालयाने सातही संशयित आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.साखरोळीतील मिसाळ कुटुंबियांवर वाडीतील लोकांनी बहिष्कार टाकला, हे खरे आहे. वाडीतील लोकं मिसाळ कुटुंबियांकडे येत-जात नाहीत. त्यांच्यातील अंतर्गत वादातून हा बहिष्कार घालण्यात आला आहे. मात्र या एकूणच प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच बोलणे उचित ठरेल.- प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक