शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महापालिकेच्या निधीवर कोट्यवधींचा डल्ला..

By admin | Updated: June 10, 2015 00:32 IST

लेखापरीक्षणात ठपका : ४२ कोटी वसूलपात्र, तर १६३ कोटींचे आक्षेप; खाबूगिरी चव्हाट्यावर--.---लूट पालिका तिजोरीची-१

शीतल पाटील -सांगली -महापालिका, राज्य शासन व केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीत मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचे २०१२-१३ च्या लेखापरीक्षणात उघड झाले आहे. लेखापरीक्षकांनी, ४१ कोटी ८१ लाख रुपये वसूलपात्र रक्कम असून १६३ कोटीचे आक्षेप नोंदविले आहेत. वसंतदादा बँकेत अडकलेल्या ३३ कोटींच्या ठेवी हा कळीचा मुद्दा असला तरी, कर्मचाऱ्यांना दिलेली तसलमात (मोघम उचल) रक्कमही वसूल करण्यात आलेली नाही. शिवाय जकात विभागाकडील रक्कम लेख्याबाहेर ठेवण्याचा प्रतापही अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेच्या निधीवर डल्ला मारून गैरकारभार करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे पितळ लेखापरीक्षकांनी उघड केले आहे. मागील लेखापरीक्षणाप्रमाणेच २०१२-१३ च्या लेखापरीक्षणात वसंतदादा बँकेत अडकलेल्या ३३ कोटी ६० लाख रुपयांच्या ठेवींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वसंतदादा बँकेत खाते उघडण्यासाठी आणि मुदतठेवी ठेवण्यास मंजुरी दिलेली कागदपत्रे प्रशासनाने लेखापरीक्षकांना दिलेली नाहीत. त्यावर कडी म्हणून की काय, रक्कम व्याजासह वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहितीही दिली नाही. त्यामुळेच लेखापरीक्षकांनी ३३ कोटी ६० लाख रुपये संबंधितांकडून वसूल करण्याची शिफारस केली आहे. याप्रकरणी वसुलीत हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अहवालात ठपका ठेवला आहे. तसलमात रकमेतील गैरकारभारही लेखापरीक्षकांनी चव्हाट्यावर आणला आहे. ३१ मार्च २०१३ अखेर पालिकेच्या १३ अधिकाऱ्यांनी तब्बल १ कोटी ७८ लाख रुपयांच्या तसलमात रकमेचा हिशेब सादर केलेला नाही. तसलमात रक्कम दिल्यानंतर त्याचा उद्देश सफल होताच हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांना तसलमात दिली आहे, त्यांनी हिशेब दिल्याशिवाय दुसऱ्यांदा त्यांना तसलमात देऊ नये, असा नियम आहे. पण त्यालाही प्रशासनाने हरताळ फासला आहे. रमेश वाघमारे, आर. पी. जाधव, एस. ए. कोरे या तीन अधिकाऱ्यांना पूर्वीची तसलमात समायोजित नसताना पुन्हा तशीच उचल देण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांना नोटिसा दिल्याची कागदपत्रे सादर केली. पण लेखापरीक्षकांनी १ कोटी ७८ लाखाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून व्याज, दंडासह वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी व जकातीची रक्कम लेखा विभागाकडे जमा न करता परस्परच बँक खात्यात जमा केली जाते. परिणामी लेखा विभागाची रोकड वही व बँक पासबुकाचा ताळमेळच लागत नाही. २०१३ अखेर बँक खात्यात ११ कोटी ३८ लाख रुपये जमा होते. हे पैसे नियोजन करून मुदत ठेवीत गुंतवणूक केली असती, तर ११.३८ लाख रुपयांचे व्याज महापालिकेला मिळाले असते. त्यामुळे ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याची शिफारस केली आहे. पगार बेकायदेशीरमहापालिकेकडे २३७२ कर्मचाऱ्यांची पदे आहेत. त्यापैकी ४२६ पदे रिक्त असून १९४६ पदे कार्यरत आहेत. केवळ कुपवाड विभागाकडील १६० पदांचा आकृतीबंध मंजूर आहे. उर्वरित २२१२ पदांना शासनाची मंजुरी नाही. महापालिकेने कर्मचारी आकृतीबंधास शासनाची मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी खर्च करण्यात आलेली ४५ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम आक्षेपाधिन असल्याचे लेखापरीक्षकांनी म्हटले आहे. नियमबाह्यपदोन्नतीआश्वासित प्रगती योजनेतून कनिष्ठ लिपिकांना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती देताना ज्येष्ठता, पात्रता, शैक्षणिक अर्हता व विभागीय परीक्षा या बाबींची पूर्तता आवश्यक आहे. पण महापालिकेने आठ कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता नसताना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती दिली आहे. हे आठही कर्मचारी दहावी नापास आहेत. या कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ लिपिकपदी तीन वर्षाहून अधिक काळ काम केल्याचा दाखला प्रशासनाने दिला आहे. पण लेखापरीक्षकांनी तो फेटाळत, ही पदोन्नती शासननिर्णयाविरोधात असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पाणी सवलतीतून तीन कोटीचा फटकामहापौर उपभोक्ता पाणी बिल सवलत योजनेतून महापालिकेला २ कोटी ९८ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे. या सवलतीमुळे पाण्याची बिले वेळेत न भरण्याची नागरिकांची मानसिकता निर्माण झाली. तसेच वेळेवर बिल भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय झाला आहे. या योजनेला राज्य शासनाची मंजुरीही घेण्यात आली नसल्याचे अहवालात नमूद आहे.