शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात पिके वाचली... उन्हाच्या तडाख्यात कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : मागील चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. महापुराच्या तावडीतून वाचलेली पिके ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : मागील चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. महापुराच्या तावडीतून वाचलेली पिके मात्र उन्हाच्या तडाख्यात सापडली आहेत. विद्युत पुरवठा अद्यापही बंद असल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे, तर कोलमडून पडलेली वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महावितरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विद्युत साहित्याची वानवा असल्याने आहे त्यावरच चालतीस करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे मोठे संकट उभे आहे. विशेष म्हणजे वारणाकाठचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बारामतीहून लोकांना पाचारण केले आहे.

जुलैमध्ये महापुराच्या विळख्यात वारणाकाठची शेती बुडाली. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग ही पिके नामशेष झाली. उसाचा तर सुफडासाफ झाला; परंतु या तडाख्यातून वाचलेली पिके जोमात आली. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. भुईमूगही त्याच परिस्थितीत आहे. त्यांना आता पाण्याची गरज आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे; पण नदीकाठचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पाणी कसे द्यायचे आणि पिके कशी वाचवायची, या चिंतेत शेतकरी आहेत.

सोयाबीन, भुईमूग काढल्यानंतर शेतकरी उसाची लावणी करतो; पण ही पिकेच पुराने गेल्याने मोकळे झालेल्या रानात लावणीशिवाय पर्याय उरलेला नाही, तर आंतरपिकात केलेल्या उसाच्या लावणीसुद्धा पडल्याने दुहेरी नुकसान झाले. या ठिकाणी साफसफाई करून लागण करण्याचा तयारीत शेतकरी आहे; पण त्या लागणी आता पाण्याअभावी खोळंबल्या आहेत. ज्या माळरानात लागणी केल्या होत्या त्या पाणी मिळेना म्हणून तहानलेल्या आहेत.

सेवा संस्थेचे पीककर्ज घेऊन केलेल्या उसाच्या लागणी व अन्य पिके पुरात बुडाली. किमान त्या ठिकाणी पुन्हा दुबार पिके घ्यावीत, उसाची लागण करणे गरजेचे बनले आहे. अशा सर्व परिस्थितीत वीज कधी सुरू होणार याचीच विचारणा शेतकरी करू लागला आहे.

................

ट्रान्स्फॉर्मर बुडाल्याने अडचण

नदीकाठी चिखलाची दलदल आहे. पाणी काही ठिकाणी साचलेले आहे. तिथे पोहोचणे आणि पोल उभा करण्यासाठी खड्डा काढणे कसरत होऊन बसली आहे. सर्व ट्रान्स्फॉर्मर बुडल्याने त्यातील तेल शुद्धीकरण करणे, त्यामध्ये दुसरे ऑइल घालणे, हा प्रकार लगेच होण्यासारखा नाही. विद्युत खांब, डीपीचे पोल तुटून पडल्याने पुन्हा उभे करताना पोल मिळणे मुश्कील झाले आहे. थ्री पेज मीटरही डिजिटल असल्याने पाण्यामुळे पूर्ण खराब झाली आहेत. त्या सर्व ठिकाणी नवीन मीटर बसविणे आजमितीला शक्य नाही. साहित्य, उपकरणांचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण अडथळ्यांचा सामना करीत दुरुस्तीच्या कामात वेग घेऊ लागला आहे.

..............

हातकणंगले तालुक्यात वारणाकाठी सुमारे पाचशे ५ हजार ग्राहकांचे कनेक्शन बंद आहेत. ५०० ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करावे लागणार आहेत. किमान हजार पोल उभे करावयाचे आहेत.

.............

महापुराने विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. पूर ओसरल्यापासून महावितरणचे सर्व कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत. लवकरात लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गतीने कामकाज सुरू आहे.

-सचिनकुमार जगताप, उपकार्यकारी अभियंता, पेठवडगाव