शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

महापुरात पिके वाचली... उन्हाच्या तडाख्यात कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : मागील चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. महापुराच्या तावडीतून वाचलेली पिके ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : मागील चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. महापुराच्या तावडीतून वाचलेली पिके मात्र उन्हाच्या तडाख्यात सापडली आहेत. विद्युत पुरवठा अद्यापही बंद असल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे, तर कोलमडून पडलेली वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महावितरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विद्युत साहित्याची वानवा असल्याने आहे त्यावरच चालतीस करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे मोठे संकट उभे आहे. विशेष म्हणजे वारणाकाठचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बारामतीहून लोकांना पाचारण केले आहे.

जुलैमध्ये महापुराच्या विळख्यात वारणाकाठची शेती बुडाली. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग ही पिके नामशेष झाली. उसाचा तर सुफडासाफ झाला; परंतु या तडाख्यातून वाचलेली पिके जोमात आली. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. भुईमूगही त्याच परिस्थितीत आहे. त्यांना आता पाण्याची गरज आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे; पण नदीकाठचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पाणी कसे द्यायचे आणि पिके कशी वाचवायची, या चिंतेत शेतकरी आहेत.

सोयाबीन, भुईमूग काढल्यानंतर शेतकरी उसाची लावणी करतो; पण ही पिकेच पुराने गेल्याने मोकळे झालेल्या रानात लावणीशिवाय पर्याय उरलेला नाही, तर आंतरपिकात केलेल्या उसाच्या लावणीसुद्धा पडल्याने दुहेरी नुकसान झाले. या ठिकाणी साफसफाई करून लागण करण्याचा तयारीत शेतकरी आहे; पण त्या लागणी आता पाण्याअभावी खोळंबल्या आहेत. ज्या माळरानात लागणी केल्या होत्या त्या पाणी मिळेना म्हणून तहानलेल्या आहेत.

सेवा संस्थेचे पीककर्ज घेऊन केलेल्या उसाच्या लागणी व अन्य पिके पुरात बुडाली. किमान त्या ठिकाणी पुन्हा दुबार पिके घ्यावीत, उसाची लागण करणे गरजेचे बनले आहे. अशा सर्व परिस्थितीत वीज कधी सुरू होणार याचीच विचारणा शेतकरी करू लागला आहे.

................

ट्रान्स्फॉर्मर बुडाल्याने अडचण

नदीकाठी चिखलाची दलदल आहे. पाणी काही ठिकाणी साचलेले आहे. तिथे पोहोचणे आणि पोल उभा करण्यासाठी खड्डा काढणे कसरत होऊन बसली आहे. सर्व ट्रान्स्फॉर्मर बुडल्याने त्यातील तेल शुद्धीकरण करणे, त्यामध्ये दुसरे ऑइल घालणे, हा प्रकार लगेच होण्यासारखा नाही. विद्युत खांब, डीपीचे पोल तुटून पडल्याने पुन्हा उभे करताना पोल मिळणे मुश्कील झाले आहे. थ्री पेज मीटरही डिजिटल असल्याने पाण्यामुळे पूर्ण खराब झाली आहेत. त्या सर्व ठिकाणी नवीन मीटर बसविणे आजमितीला शक्य नाही. साहित्य, उपकरणांचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण अडथळ्यांचा सामना करीत दुरुस्तीच्या कामात वेग घेऊ लागला आहे.

..............

हातकणंगले तालुक्यात वारणाकाठी सुमारे पाचशे ५ हजार ग्राहकांचे कनेक्शन बंद आहेत. ५०० ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करावे लागणार आहेत. किमान हजार पोल उभे करावयाचे आहेत.

.............

महापुराने विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. पूर ओसरल्यापासून महावितरणचे सर्व कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत. लवकरात लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गतीने कामकाज सुरू आहे.

-सचिनकुमार जगताप, उपकार्यकारी अभियंता, पेठवडगाव