शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिके गेली कुजून, राहिल्या फक्त काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम ...

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम सर्वच पिकावर झाल्याने ती सडून गेली आहेत. पुराचे पाणी ओसरू लागल्यावर कधी एकदा आपले शेत आणि पीक बघू अशा आशेने गेलेल्या शेतकऱ्यांची पीक बघून घोर निराशा झाली आहे.

सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा क्विंटलला दहा हजारच्या जवळपास दर गेला, पण पूर पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात सोयाबीनचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही याचा मोठा फटका कवठेसार येथील शेतकऱ्यांना बसला आहे, तर दानोळी, कोथळी गावात फ्लॉवर, कोबीज, टोमॅटो, झेंडू अशी भाजीपाला व फुलझाडांच्या शेतात केवळ खुंट शिल्लक राहिले आहेत.

ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, नुकत्याच केलेल्या आडसाली लावणी, रोपे कुजून गेली आहेत. तसेच थोड्याच दिवसांत मोठ्या उसाची शेंडे गळून पडू लागणार व डोळे फुटून कोंब येण्यास सुरुवात होऊन ऊस पोकळ होण्यास सुरुवात होणार असा अनेकदा आलेल्या पुराचा अनुभव आहे.

अगोदरच २०१९ च्या महापुरात आर्थिक अडचणीतून सावरला नसताना आणखी एकदा महापूर आल्याने पुढचं आर्थिक नियोजन कसं करायचं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

चौकट..

प्रामाणिक शेतकरी वंचितच

२०१९च्या पूरकाळात प्रामाणिकपणे पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करून दोन वर्षे उलटत आले, पण अद्याप शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. यंदा महापुरामुुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोटो : महापुरामुळे सोयाबीन पिकाच्या अशा फक्त काड्या शिल्लक राहिल्या आहेत.

छाया : भालचंद्र नांद्रेकर, दानोळी