शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पिके गेली कुजून, राहिल्या फक्त काड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम ...

पुराचे पाणी जलद गतीने वाढले, पण ओसरताना मात्र संथ गती राहिली. त्यामुळे पिकांवर पाण्याच्या वस्त्या वाढल्या. त्याचा मोठा परिणाम सर्वच पिकावर झाल्याने ती सडून गेली आहेत. पुराचे पाणी ओसरू लागल्यावर कधी एकदा आपले शेत आणि पीक बघू अशा आशेने गेलेल्या शेतकऱ्यांची पीक बघून घोर निराशा झाली आहे.

सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा क्विंटलला दहा हजारच्या जवळपास दर गेला, पण पूर पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या नशिबात सोयाबीनचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही याचा मोठा फटका कवठेसार येथील शेतकऱ्यांना बसला आहे, तर दानोळी, कोथळी गावात फ्लॉवर, कोबीज, टोमॅटो, झेंडू अशी भाजीपाला व फुलझाडांच्या शेतात केवळ खुंट शिल्लक राहिले आहेत.

ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, नुकत्याच केलेल्या आडसाली लावणी, रोपे कुजून गेली आहेत. तसेच थोड्याच दिवसांत मोठ्या उसाची शेंडे गळून पडू लागणार व डोळे फुटून कोंब येण्यास सुरुवात होऊन ऊस पोकळ होण्यास सुरुवात होणार असा अनेकदा आलेल्या पुराचा अनुभव आहे.

अगोदरच २०१९ च्या महापुरात आर्थिक अडचणीतून सावरला नसताना आणखी एकदा महापूर आल्याने पुढचं आर्थिक नियोजन कसं करायचं असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तसेच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

चौकट..

प्रामाणिक शेतकरी वंचितच

२०१९च्या पूरकाळात प्रामाणिकपणे पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करून दोन वर्षे उलटत आले, पण अद्याप शेतकऱ्यांना ते मिळालेले नाही. यंदा महापुरामुुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फोटो : महापुरामुळे सोयाबीन पिकाच्या अशा फक्त काड्या शिल्लक राहिल्या आहेत.

छाया : भालचंद्र नांद्रेकर, दानोळी