शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पीक बुडाले आणि सोबत स्वप्नेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

दोन दिवसांच्या पावसाने होत्याचे नव्हते केले लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: ज्या पिकाकडे बघून मन हरखून जायचं, पुढची स्वप्नं दिसायची ...

दोन दिवसांच्या पावसाने होत्याचे नव्हते केले

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: ज्या पिकाकडे बघून मन हरखून जायचं, पुढची स्वप्नं दिसायची तेच पीक पुराच्या पाण्यात गुडूप झाल्याचे पाहताना बळीराजाचे मन गदगदून येतंय, डोळ्यात पाणी साठतंय, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले शिवार पाण्याने भरलेले पाहून हुंदका दाटून येतोय, महिन्यापासूनचे सारे कष्ट, पैसा पाण्यात गेल्याने आता पुढे काय़, या चिंतेने तर डोळाही लागेना झालाय.

जिल्ह्यात आलेल्या महापुरातील हे शेतकऱ्याचे प्रातिनिधिक चित्र. तसा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू. भले मोठे शिवार नसले तरी आहे त्या तुकड्यात तो घाम गाळून सोने पिकवतो आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. पण, गेल्या दोन वर्षांपासून तर नियतीने जणू परीक्षाच घेण्यास सुरुवात केली आहे. २०१९ ला ‘न भूतो न भविष्यती’ असा महापूर आला. जिल्ह्यातील २८६ गावातील ७८ हजार हेक्टरवरील उभी पिके कुजून गेली. मोठ्या कष्टाने पीक महापुराच्या एका तडाख्यात मातीमोल झाले. या जखमा घेऊनच शेतकरी पुन्हा कामास लागला. २०२० मध्ये दोन वेळा महापूर येता येता वाचला, बऱ्यापैकी पीक हातात आले, पुन्हा मागचे सगळे विसरून या खरिपाची तयारी केली. अगदी एप्रिल, मे महिन्यातील वादळाची तमा न बाळगता शेत पेरणीयोग्य केले. कोरोना असतानाही बियाणे, औषधे महागले असताना आणि इंधनाचे दर वाढल्याने मशागत महागली असतानाही बळीराजा शिवार फुलवण्यात व्यस्त झाला. मागचे दोन महिने राब राब राबून पीक आणले, आता वाढीच्या ऐन बहरात पिके असताना पुन्हा एकदा महापुराने धडक दिली. मागच्या पंधरवड्यात कडक उन्हामुळे कोमेजलेली पिके पाहून जीव तुटत होता, तोवर पावसाची भुरभुर सुरू झाल्याने जीवात जीव आला होता. पिकाकडे बघून आनंदात असतानाच केवळ दोन-तीन दिवसांत ढगफुटीसारख्या आलेल्या पावसाने आणि महापुराने होत्याचे नव्हते केले.

.........

महिनाभर घात नाही

ज्यांची शिवारे पूर्ण बुडाली त्यांची तर अपरिमित हानी झाली, ज्यांची माळराने आहेत, तीही जमीन पावसाच्या माऱ्याने खारवटून गेली आहेत. महिनाभर रानाला घाती येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

नव्या खर्चाची भर

आता पीक तर कुजले आहेच, पण ते पूर ओसरल्यानंतर बाहेर काढून टाकायला देखील खर्च करावा लागणार आहे. उत्पन्न काहीच नाही, उलट नव्या खर्चाची भर पडणार आहे

........

भात पीकही धोक्यात

आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठं आणि कसं लावायचं, अशी परिस्थिती आहे. सगळी पिके जमीनदोस्त झाली असताना पंचनामे कसे आणि कधी करायचे, असा प्रश्न आहे. नदीकाठचा ऊस पूर्णपणे पाण्यात आहे, सोयाबीन, भुईमूग कुजल्यात जमा आहे. भात शंभर टक्के पाण्याखाली आहे, पण तोही पूर चार दिवसांत ओसरला तर जगू शकतात, अन्यथा भात पीकही धोक्यात आहे. भरपूर पैसे खर्च करून लावलेला भाजीपाला, आले, मिरचीसारखी पिके ही कुजल्यात जमा आहेत.

जिल्ह्यात यंदा वादळी पाऊस चांगला झाल्याने आणि मृगही वेळेत दाखल झाल्याने जून अखेरलाच ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, मागच्याच आठवड्यात भात रोप लागणीही पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे पेरणीचा टक्काही शंभर टक्क्यांवर गेला होता.