शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे भरले पाच लाख, मिळाले २१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उंबरठा उत्पन्नामुळे कायमच मदतीच्या कक्षेबाहेर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मागील ...

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उंबरठा उत्पन्नामुळे कायमच मदतीच्या कक्षेबाहेर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मागील खरीप हंगामात लॉटरीच लागली. भरलेल्या विम्याच्या रकमेपैकी चौपट रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळाली; पण यात शेतकऱ्यांची संख्या मात्र अवघी साडेसात टक्के आहे. तब्बल ९३ टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

मुळातच कोल्हापूरचे सरासरी उत्पन्न जास्त असल्यामुळे पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत धरलेच जात नाही. मात्र, त्यासाठी गेले वर्ष अपवाद ठरले. महापूर आणि परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाल्याने कधी नव्हे ते विम्याचे निकष लागू झाले. लाभ मिळत नसल्याने नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली; पण ६३४ हेक्टरवरील २ हजार ७७२ शेतकऱ्यांनी लागली लाॅटरी ठीक, नाही तर वाया गेले म्हणून पैसे भरले. नाममात्र हप्ता असल्यामुळे त्यांची ही रक्कम ५ लाख ३९ हजार १०६ इतकी झाली.

सरकारने ब्रोकर कंपनी म्हणून नेमलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ही रक्कम भरून घेतली.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात आपत्ती या दोन वर्गवारीमध्ये हप्ते भरले गेले. त्यांना दोन कोटी ६९ लाख ५५ हजार ४९८ रुपयांचे विम्याचे संरक्षण निश्चित केले गेले. प्रत्यक्षात यातील २१ लाख ३६ हजारांची विमा नुकसानीची रक्कम खरीप हंगामात २१० शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. पाच लाख रुपये भरले असताना २१ लाखांची विम्याची रक्कम परतावा मिळण्याची जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

१) पॉईंटर्स

खरीप २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र - २ लाख ४३ हजार हेक्टर

२) एकूण मंजूर पीकविमा : २१ लाख ३६ हजार

शेतकऱ्यांनी भरलेले पैसे - ५ लाख ३९ हजार १०६

३) विमा काढणारे शेतकरी - २७७२

लाभार्थी शेतकरी - २१०

आतापर्यंत यांना मिळाला विमा - २१०

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम - २१ लाख ३६ हजार

४) दोन हजार ५६२ शेतकरी बाद पीक विम्यासाठी २७७२ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी २१० जणांना लाभ मिळाला. ५८७ जणांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले. ८३३ जणांनी क्लेम मागितला होता, तर इतर त्रुटीसह एकूण २ हजार ५६२ शेतकरी या योजनेतून बाद केले गेले.

५) तक्ता

आपत्ती पात्र रक्कम दिलेले न दिलेले एकूण रक्कम

नैसर्गिक २२१ १३६ ३६ १२ लाख

काढणीपश्चात ३४ ३४ ०० ९ लाख ३६ हजार

चौकट

पीक विम्यात अंतर्भाव असलेली पिके व विमा हप्ता (प्रती हेक्टरी)

पीक विमा हप्ता

गहू ५७०

ज्वारी ४२०

हरभरा ५२५

भुईमूग ४५७

प्रतिक्रिया

आपत्ती सांगून येत नाही म्हणून पीक विम्याचा हप्ता भरतो; पण दरवेळी निकष आडवे येतात आणि लाभापासून वंचित राहावे लागते. पीक विम्याचे निकष बदलले तरच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे, अन्यथा ही योजना म्हणजे विमा कंपन्यांचा नफा वाढवणारीच ठरणार आहे. भुईमुगासाठी विमा हप्ता भरला होता; पण कंपनीकडून वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा माझा अनुभव आहे.

विशाल चौगुले, अकिवाट (ता. शिरोळ)

जिल्ह्यात उसाचे पीक जास्त आहे. महापूर आणि अवकाळी पावसामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. खरंच शासनाला शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटत असेल तर उसाचा समावेश विम्यात करण्याची गरज आहे.

सागर शंभूशेटे,

नांदणी (ता. शिरोळ)