शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला उत्पादकांसमोर कडक लॉकडाऊनचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधामुळे आणि पुढे जाऊन मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने ...

जयसिंगपूर :

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधामुळे आणि पुढे जाऊन मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या मुंबईकडे जाणारा भाजीपाला सुरळीत जात असला तरी शनिवारी व रविवारी होणाऱ्या विकेंड लॉकडाऊनचा परिणाम देखील भाजीपाला वितरणावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या बाजारपेठेत पाठवला जाणारा भाजीपाला उत्पादित करण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेत जाणारा भाजीपाला उत्पादित करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची बनली आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला आठवडी बाजार बंद राहिले. त्यानंतर मुंबई, अहमदाबादला जाणारा भाजीपाला ठप्प झाला होता. परिणामी, शेतातच भाजीपाला राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यात काकडी, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, दोडका, वांगी व ढोबळी मिरची ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांचा भाजीपाला कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड याठिकाणी होलसेल दरात भाजी विक्रेते विकत घेतात. तर या स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबईला देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला संघाच्या माध्यमातून पाठविला जातो. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंद होत आहेत. त्याचा फारसा परिणाम होत नसला तरी विकेंड लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर मोठे लॉकडाऊन होईल, या भीतीने नवीन पिके घ्यायची की नाहीत की पर्यायी पिकाकडे वळायचे, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. किमान स्थानिक बाजारपेठेत जाणारा भाजीपाला पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने देखील मोठ्या बाजारपेठांचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे.

सध्या काकडी, दोडका, वांगी, टोमॅटो यासह भाजीपाला मुंबई बाजारपेठेत सुरळीतपणे जात आहे. शनिवारी व रविवारी होणाऱ्या लॉकडाऊनचा कितपत परिणाम होतो, त्यावरच भाजीपाला वितरणाचे नियोजन समजेल, अशी माहिती भाजीपाला संघ व्यवस्थापनाने दिले.

कोट - महापूर, कोरोना, अतिवृष्टी यामुळे गतवर्षी आर्थिक फटका बसला होता. पुन्हा कडक लॉकडाऊन झाले तर आणखी मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने भाजीपाला वितरणाबाबत उपाययोजना राबवाव्यात.

- उदय आलमाने, शेतकरी दानोळी

फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - दानोळी (ता. शिरोळ) येथे शेतकऱ्याने घेतलेले कारल्याचे पीक.