शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पोल्ट्रीधारकांवरील संकट व्यापाऱ्यांसाठी सुगीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकीकडे नैसर्गिक संकटाने पोल्ट्रीधारक ग्रासले असताना, दुसऱ्या बाजूला व्यापारी त्यांना राजरोसपणे लुटत ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एकीकडे नैसर्गिक संकटाने पोल्ट्रीधारक ग्रासले असताना, दुसऱ्या बाजूला व्यापारी त्यांना राजरोसपणे लुटत आहेत. पोल्ट्रीधारकांवरील संकट म्हणजे व्यापाऱ्यांना लुटीसाठी सुगीच येते. बर्ड फ्लूच्या भीतीचे अस्त्र दाखवून आता ५० रुपये किलोने पक्ष्यांची खरेदी करून दुकानदारांना ८० रुपये किलोने विक्री केली जाते. हाच पक्षी ग्राहकांच्या पदरात मात्र १२० रुपये किलोने पडतो. शेतकरी टू ग्राहक यामधील साखळीत तब्बल ७० रुपये मुरतात.

बर्ड फ्लूचा आजार आला असे समजताच, कोंबड्यांचे दर पडण्यास सुरुवात झाली आहे. या आजाराची महाराष्ट्रात तीव्रता किती आहे? कोल्हापुरात तो पोहोचला का? हे समजायच्या आतच व्यापारी मंडळी जाणीवपूर्वक या संकटाचा कांगावा करत सुटले आहेत. पक्ष्यांची विक्री करा अन्यथा तुम्ही अडचणीत याल, अशी भीती घालत असल्याने शेतकरी भीतीपोटी पोल्ट्री मोकळ्या करू लागले आहेत. या संकटाचा फायदा घेत व्यापारी ४० ते ५० रुपये किलो दराने पक्षी खरेदी करू लागले आहेत. तीन किलोचा पक्षी तयार होण्यासाठी साधारणत: ४५ ते ५० दिवस लागतात. त्यासाठी खाद्य, औषध व देखभालीचा खर्च २०० रुपये येतो. मात्र हाच पक्षी १५० रुपयांना विक्री करावा लागत आहे. अशा प्रकारे बर्ड फ्लूची भीती दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असताना, शासकीय यंत्रणेचे मात्र, या शेतकऱ्यांशी आमचा काहीच संबंध नसल्यासारखे वर्तन आहे. (उत्तरार्ध)

जुने व्हिडीओ सोशल मीडियावर

महाराष्ट्रात यापूर्वी २०१६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी जिवंत पक्ष्यांना गाडण्यात आले होते. त्यावेळचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याने शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत.

ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’

थंडीच्या काळात ब्रॉयलर कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातच किंक्रांतीचा सण आल्याने मागणी वाढते आणि दर तेजीत असतो. मात्र यंदा ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’ आली आहे.

वीस दिवसांचे पक्षी कटिंगला

एरव्ही ४५ ते ५० दिवसांचा म्हणजेच तीन किलोचा पक्षी कटिंगला येतो. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने २० ते २५ दिवसांची पिले कटिंगला येत आहेत.

पोल्ट्रीधारकांचे विस्कटलेले गणित-

एका पिलाचा दर - ४८ रुपये

खाद्य (४५ दिवस) - १४० रुपये

औषध खर्च - १० रुपये

इतर खर्च - ५ रुपये

एकूण खर्च - २०३ रुपये

विक्रीतून मिळणारे पैसे - १५० रुपये

पोल्ट्रीधारकांना पॅकेज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - राजू शेट्टी

कोल्हापूर : गेली दोन वर्षे विविध संकटांनी पोल्ट्रीधारक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून त्याला सावरण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज द्यावे, यासाठी आपण येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

‘कडकनाथ’मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली, यामध्ये पोळलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचे प्रश्न असताना, लॉकडाऊन काळात कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यावेळीही नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता बर्ड फ्लूचे नव्याने संकट आल्याने कोंबड्यांचे दर कोसळले आहेत. आता राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता मदत करण्याची गरज आहे. लाखो रुपयांची कर्जे काढून व्यवसाय उभे केले, त्यांचे व्याज माफ करण्याबरोबरच पोल्ट्री व्यवसायासाठी पॅकेज द्यावे, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.