शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

जोतिबावर पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST

सतीश पाटील शिरोली : श्री क्षेत्र जोतिबावरील पिण्याच्या पाण्याचे व स्ट्रीट लाईट वीज पुरवठाचे ५६ लाख रुपये थकीत असल्याने ...

सतीश पाटील

शिरोली : श्री क्षेत्र जोतिबावरील पिण्याच्या पाण्याचे व स्ट्रीट लाईट वीज पुरवठाचे ५६ लाख रुपये थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला होता. १५ दिवसांनंतर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे. देवस्थान समितीकडून ३४ लाख रुपये निधी येणे आहे. तो शासनाने दिला तर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होऊ शकतो. वीजबिल भरले नाही तर पुन्हा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाची टांगती तलवार जोतिबाकरांवर कायम आहे.

जोतिबावर पिण्याचे पाणी हे केर्ली गावातून येते. आठवड्यातून दोन वेळा ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. गावात १२०० नळ कनेक्शन आहेत. वर्षाला ७५० रुपये इतकी पाणीपट्टी आकारणी होते. तर प्रत्येक वर्षी महावितरण कंपनीला पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटची ६० लाख रुपये वीज आकारणी पोटी पैसे भरावे लागतात. या पैशांचे नियोजन ग्रामपंचायतीने ५० लाखांचा भाविकांचा कर वसूल ठेका दिला आहे.त्यातून तसेच १५ वा वित्तायोग ५ लाख, जिल्हा परिषद १ लाख, देवस्थान समिती २ लाख असं प्रत्येक वर्षी नियोजन केलेले असते. पण सन २०२० मध्ये कोरोना या महामारीमुळे संपूर्ण मंदिर लाॅकडाऊन करण्यात आली आहेत. आणि भाविकांना ही प्रवेश नाही. त्यामुळे भाविक कर वसुली बंद आहे.

तसेच स्थानिक लोकांचा रोजगार ही मंदिर सुरू नसल्याने बंद आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे पैसे भागवायला पैसेच नाहीत. अखेर वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. आणि गावचा पाणीपुरवठा बंद झाला.

यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक लावून वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा सुरू करून तात्पुरता पाणीपुरवठा दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. पण महावितरण कंपनीला पैसे भरले नाही तर पुन्हा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

चौकट :-

देवस्थान समितीने प्रत्येक वर्षी वाडी रत्नागिरी जोतिबा रोगरासाठी दोन लाख रुपये निधी देण्याचा आहे.पण सन २००४ पासून गेली १७ वर्षे हा निधी दिलेला नाही. देवस्थान समितीकडून सुमारे ३४ लाख रुपये येणे आहेत.हे पैसे आले तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो.

प्रतिक्रिया :-

वर्षाला देवस्थान समितीकडून २ लाखांचा निधी जोतिबासाठी देण्याचे आहे.पण गेली १७ वर्षे हा निधी आलेला नाही.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आह (शिवाजीराव सांगले -उपसरपंच जोतिबा )

गेली दोन वर्षे मंदिर बंद आहे.देवस्थानच्या भक्त करातून सुमारे ५० लाख वर्षाला येतात पण मंदिर बंद असल्याने कर आकारणी बंद आहे.त्यामुळे हा ५० लाखांचा कर आला नाही.(जयसिंग बिडकर-ग्रामविकास अधिकारी)

जोपर्यंत मंदिर उघडून कर वसूल होत नाही तो पर्यंत जोतिबा डोंगरावरील वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित करू नये. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आत्मदहन करणार असा (लखन लादे -ग्रामपंचायत सदस्य,मनसे पन्हाळा तालुका सचिव).