शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट

By admin | Updated: January 3, 2015 00:02 IST

अवकाळीचा परिणाम : उत्पादन खर्चात वाढ

गणपती कोळी - कुरुंदवाडऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखान्याला घालवण्यासाठी धावपळ करत असतानाच अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण केले आहे. मुळातच उत्पादन व उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या हजेरीने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे साखर कारखानदार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार यांच्यापाठोपाठ निसर्गानेही शेतकऱ्यांची पाठ घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.जानेवारी उजाडला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांची जुलैमधील ऊसतोड सुरू असल्याने अठरा-अठरा महिने ऊस शेतात ठेवून क्रमपाळीची वाट ऊस उत्पादक शेतकरी पाहत आहे. ऊसतोडीला विलंब होत असल्याने टनेजमध्ये घट होत आहे. अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आणखीन आर्थिक संकटात सापडत आहे. काळी कसदार जमीन असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी ट्रॅक्टर अडकतो. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी वाहनधारक अवाजवी पैशाची मागणी करत आहेत. आर्थिक पिळवणूककाळी माती, बारमाही पाणी, पोषक वातावरण यामुळे या भागात उसाचीच शेती घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत येथील शेतकरी विक्रमी उसाचे उत्पादनही घेत आहेत. मात्र, उत्पादन खर्च व साखर कारखानदाराकडून मिळणारा दर यामध्ये फारशी तफावत राहत नसल्याने ऊसदरासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लढावे लागत आहे. त्यातच खुशालीच्या नावाखाली ऊसतोड मजुराकडून व एन्ट्री म्हणून ऊस वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मुकाट्याने सर्व आर्थिक पिळवणूक सहन करत उत्पादन व उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालत आहे.