शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

गुन्ह्यांमध्ये आता सरकारी कर्मचारी पंच

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी

शृंगारतळी : सरकारी कर्मचारी म्हणून रूबाबात वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे मध्ये गृहविभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून कोर्टाची पायरी चढावी लागणार असल्याचे चित्र डोळ्यासमोर फिरू लागले आहे़गृह विभागाने काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपास अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्यावेळी उपस्थित असलेल्या पंचांचे जबाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरत असतात. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीस येण्याकरिता काही प्रकारणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो.तपासी अधिकाऱ्याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील, याची खात्री नसते. अशा परिस्थितीत पंच फितूर झाल्यामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. असे गृह विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहिल. सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात म्हणण्यात आले आहे. ही सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे, त्या परिसरात वास्तव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंच म्हणून घ्यावे. जेणेकरून खटल्याच्या सुनावणी दरम्यान ही पंचासमक्ष उपस्थित राहणे सुलभ होईल. एकाच कर्मचाऱ्याला वांरवार पंच म्हणून घेण्यात येवू नये. फिर्यादी व आरोपीे यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचायास पंच म्हणून घेण्यात येवू नये, अशी अटही घालण्यात आली आहे. (वार्ताहर)