शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

गुन्ह्यांमध्ये आता सरकारी कर्मचारी पंच

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी

शृंगारतळी : सरकारी कर्मचारी म्हणून रूबाबात वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे मध्ये गृहविभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून कोर्टाची पायरी चढावी लागणार असल्याचे चित्र डोळ्यासमोर फिरू लागले आहे़गृह विभागाने काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपास अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्यावेळी उपस्थित असलेल्या पंचांचे जबाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरत असतात. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीस येण्याकरिता काही प्रकारणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो.तपासी अधिकाऱ्याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील, याची खात्री नसते. अशा परिस्थितीत पंच फितूर झाल्यामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. असे गृह विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहिल. सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात म्हणण्यात आले आहे. ही सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे, त्या परिसरात वास्तव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंच म्हणून घ्यावे. जेणेकरून खटल्याच्या सुनावणी दरम्यान ही पंचासमक्ष उपस्थित राहणे सुलभ होईल. एकाच कर्मचाऱ्याला वांरवार पंच म्हणून घेण्यात येवू नये. फिर्यादी व आरोपीे यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचायास पंच म्हणून घेण्यात येवू नये, अशी अटही घालण्यात आली आहे. (वार्ताहर)