शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST

शेकापची मागणी : तासगावमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, रॅली

कवठेएकंद : ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे अदा करणे बंधनकारक आहे; परंतु साखर कारखानदारांनी याबाबत टाळाटाळ केली जाते. एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच उसाचा अंतिम दर ३५०० रुपये प्रतिटन मिळावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली. ऊसदरप्रश्नी आज (मंगळवार) तासगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व शंकरराव माळी, संपतराव पवार, सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, शंकरराव थोरबोले, जिल्हा चिटणीस शरद पाटील आदींनी केले. सिध्देश्वर मंदिर चौकातून तहसील कार्यालयावर दुचाकीवरुन घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा काढला.उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल ऊस गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळावी, शेती पंपांच्या विजेची दरवाढ रद्द करावी, शेतीमालावरील अडत रद्द करावी, शेतकऱ्यांना मासिक २000 रु. पेन्शन मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच उसाला अंतिम दर ३५00 रुपये प्रतिटन मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. शेतीमालाला दर मिळत नाही, वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.प्रा. बाबूराव लगारे म्हणाले की, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस गेल्यापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी शंकरराव माळी, संपतराव पवार, सूर्यकांत पाटील, शरद पाटील, शंकरराव थोरबोले, वसंतराव तपासे, अशोक घाईल, डॉ. नरेंद्र खाडे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शेखर दळवी यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवू, अशा आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)बिलाची मागणीगतवर्षीच्या ऊस हंगामातील फक्त एकच हप्ता ८०० रु. ने दर देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अशा कारखान्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शेकापने पुकारलेल्या धडक मोर्चावेळी शेकापसह राष्ट्रवादी, भाजप, महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.