शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST

शेकापची मागणी : तासगावमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, रॅली

कवठेएकंद : ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे अदा करणे बंधनकारक आहे; परंतु साखर कारखानदारांनी याबाबत टाळाटाळ केली जाते. एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच उसाचा अंतिम दर ३५०० रुपये प्रतिटन मिळावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली. ऊसदरप्रश्नी आज (मंगळवार) तासगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व शंकरराव माळी, संपतराव पवार, सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, शंकरराव थोरबोले, जिल्हा चिटणीस शरद पाटील आदींनी केले. सिध्देश्वर मंदिर चौकातून तहसील कार्यालयावर दुचाकीवरुन घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा काढला.उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल ऊस गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळावी, शेती पंपांच्या विजेची दरवाढ रद्द करावी, शेतीमालावरील अडत रद्द करावी, शेतकऱ्यांना मासिक २000 रु. पेन्शन मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच उसाला अंतिम दर ३५00 रुपये प्रतिटन मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. शेतीमालाला दर मिळत नाही, वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.प्रा. बाबूराव लगारे म्हणाले की, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस गेल्यापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी शंकरराव माळी, संपतराव पवार, सूर्यकांत पाटील, शरद पाटील, शंकरराव थोरबोले, वसंतराव तपासे, अशोक घाईल, डॉ. नरेंद्र खाडे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शेखर दळवी यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवू, अशा आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)बिलाची मागणीगतवर्षीच्या ऊस हंगामातील फक्त एकच हप्ता ८०० रु. ने दर देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अशा कारखान्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शेकापने पुकारलेल्या धडक मोर्चावेळी शेकापसह राष्ट्रवादी, भाजप, महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.