शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

एफआरपी न देणाऱ्यांवर फौजदारी करा

By admin | Updated: December 31, 2014 00:09 IST

शेकापची मागणी : तासगावमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, रॅली

कवठेएकंद : ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे अदा करणे बंधनकारक आहे; परंतु साखर कारखानदारांनी याबाबत टाळाटाळ केली जाते. एफआरपीप्रमाणे ऊसदर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच उसाचा अंतिम दर ३५०० रुपये प्रतिटन मिळावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली. ऊसदरप्रश्नी आज (मंगळवार) तासगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व शंकरराव माळी, संपतराव पवार, सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, शंकरराव थोरबोले, जिल्हा चिटणीस शरद पाटील आदींनी केले. सिध्देश्वर मंदिर चौकातून तहसील कार्यालयावर दुचाकीवरुन घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा काढला.उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल ऊस गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळावी, शेती पंपांच्या विजेची दरवाढ रद्द करावी, शेतीमालावरील अडत रद्द करावी, शेतकऱ्यांना मासिक २000 रु. पेन्शन मिळावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच उसाला अंतिम दर ३५00 रुपये प्रतिटन मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. शेतीमालाला दर मिळत नाही, वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.प्रा. बाबूराव लगारे म्हणाले की, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस गेल्यापासून १४ दिवसांत साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. कायद्याप्रमाणे दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी शंकरराव माळी, संपतराव पवार, सूर्यकांत पाटील, शरद पाटील, शंकरराव थोरबोले, वसंतराव तपासे, अशोक घाईल, डॉ. नरेंद्र खाडे, दीपक जाधव यांची भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शेखर दळवी यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन शासनाकडे पाठवू, अशा आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. (वार्ताहर)बिलाची मागणीगतवर्षीच्या ऊस हंगामातील फक्त एकच हप्ता ८०० रु. ने दर देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अशा कारखान्यांबाबत शासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शेकापने पुकारलेल्या धडक मोर्चावेळी शेकापसह राष्ट्रवादी, भाजप, महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.